Assam Governor gulab chand kataria News : राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांनी काल (रविवारी) तेरा राज्यापालांची नियुक्ती केली. यात आसामच्या राज्यपालपदी गुलाबचंद कटारिया यांची नियुक्ती केली आहे. ते यापूर्वी राजस्थान विधानसभेत विरोधीपक्षनेता होते.
राज्यपालपदी विराजमान होताच कटारिया यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS )तोंडभरुन कौतुक केल्याने ते वादात सापडले आहेत.आरएसएसशी असलेल्या जुन्या नातेसंबधाबाबत त्यांनी भाष्य केले आहे.
"मी माझ्या जीवनात कधीही पदाची अपेक्षा केली नाही. RSS ने आम्हाला देशासाठी काम करणे शिकवलं," असे कटारिया म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
कटारिया यांची राज्यपाल नियुक्ती करणे ही भाजपची खेळी असल्याचे बोललं जाते, कारण भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून त्यांना दूर केले आहे. त्यांची राज्यपाल नियुक्ती केल्याचा सकारात्मक संदेश दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपमधील मोठे नेते म्हणून कटारिया ओळखले जातात. राजस्थानमधील आगामी निवडणुकीसाठी भाजपची हा डाव असल्याची चर्चा आहे.
कटारिया यांच्या राज्यपालपदी नियुक्तीनंतर भाजप राजस्थानमध्ये मोठा फेरबदल करण्याची तयारीत आहे.कटारिया हे मुख्यमंत्रीपदाचे मोठे दावेदार होते, मोदी सरकारने त्यांची राज्यपालपदी नियुक्ती केल्याने राजस्थान भाजपमधील अंतर्गत वाद संपले आहेत, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
78 वर्षीय कटारिया हे ८ वेळा आमदार म्हणून निवडणून आले होते, ते माजी मंत्री होती. "राज्यपालपदाचा सन्मान राखून माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी व्यवस्थितपणे सांभाळेल, असा विश्वास कटारिया यांनी व्यक्त केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.