Udayanraje Bhosale : 'आणीबाणी लागू करून इंदिरा गांधींनी संविधानाचा गळा कापला' ; उदयनराजेंचा घणाघात!
Loksabha Election 2024 : 'विरोधकांना मत मागण्यासाठी मुद्दाच नसल्याने सध्या संविधानाचा विषय पुढे आणण्यात आला आहे. लोकं मत मागायला गेल्यावर पेढे देणार नाही तर जोडे देणार असे वातावरण असल्यामुळे संविधान बदलाचा मुद्दा घेऊन विरोधक मतं मागत आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आणीबाणी लागू केली. लोकांना तुरुंगात घालून चिरडून टाकले. लोकांना मूलभूत हक्क देण्याचे काम 55 वर्षांत काँग्रेसला जमले नाही. आणीबाणी लागू करून इंदिरा गांधी यांनी संविधानाचा गळा कापला.' असा घाणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी कॉंग्रेसवर केला.
महायुतीचे उमेदवार खासदार भोसले(Udayanraje Bhosale) यांच्या प्रचारार्थ पाटण येथे आयोजित सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, रविराज देसाई, यशराज देसाई, रमेश पाटील, विक्रमबाबा पाटणकर, जयवंतराव शेलार, प्रदीप पाटील, भरत पाटील, कविता कचरे, आदी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उदयनराजे भोसले म्हणाले, 'पाटण तालुक्यात पर्यटन वाढीसाठी मी व शंभूराजे प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) अजित पवार हे कुठेही त्यात कमी पडणार नाही. स्थिर सरकार असल्यामुळे निधी कमी पडणार नाही. पाटण तालुक्यातील लहान गावातील रस्ते झाले आहेत. दहा वर्षांत देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विकास झाला आहे. विरोधकांना मत मागण्यासाठी मुद्दाच नसल्याने सध्या संविधानाचा विषय पुढे आणण्यात आला आहे.'
याशिवाय, 'इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आणीबाणी लागू केली. लोकांना तुरुंगात घालून चिरडून टाकले. लोकांना मूलभूत हक्क देण्याचे 55 वर्षात काँग्रेसला जमले नाही. आणीबाणी लागू करून इंदिरा गांधी यांनी संविधानाचा गळा कापून टाकला. लोकं मत मागायला गेल्यावर पेढे देणार नाही तर जोडे देणार असे वातावरण असल्यामुळे संविधान बदलाचा मुद्दा घेऊन विरोधक मते मागत आहेत. विरोधकांच्या बोलण्यास बळी न पडता मतदान करावे.'
तसेच 'महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते पालकमंत्री होते त्यांच्याकडे सिंचन विभाग होता यांनी एक नवा पैसा पाणी प्रकल्पासाठी दिला नाही. महाविकास आघाडीचे नेत्यांनी पंचायतराज व्यवस्थेच्या विचाराला मागेच तिलांजली दिली आहे. सत्ता एकवटल्यामुळे अहंकार निर्माण होऊन ते लोकांचे प्रश्न विसरुन गेले. उमेदवार सक्षम व कोणत्या पक्षाचा आहे याकडे बघून मतदान केले पाहिजे. काम न करता मत मागणीची लायकी तरी आहे का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पाटणमधुन मताधिक्य देणार - देसाई
पाटण तालुक्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी व शासन खर्चाने शेती पाणी पुरवठा योजना करण्याची मागणी करुन पालकमंत्री देसाई म्हणाले, भाजप व शिवसेना यांचा लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा पैरा ठरला असून चार पिढ्यांची नाळ असणारा आमचा कार्यकर्ता विधानसभा निवडणुकीसारखा प्रयत्न करून उदयनराजे भोसले यांना निवडून आणतील. विकासाचे व्हीजन आणि विकसित भारताचे ध्येय असलेल्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्व ताकदीनिशी तयार आहोत. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आम्ही चार आमदार असून आमदारकी लढवल्यासारखे चित्र दिसेल.
(Eduited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.