
Ratnagiri News : मागील काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार सुरू आहे. ठाकरे गटाला खिंडार पडले जात असून कोकणात सर्वाधिक धक्के दिले जातायत. नुकताच उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असणाऱ्या राजन साळवींनी साथ सोडली. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला रत्नागिरीत मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अशातच शिंदे सेनेचे नेते तथा मंत्री भरत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी कोकणात ठाकरेंना आणखी मोठे धक्के बसणार असा दावा केला होता. त्यांचा रोख वैभव नाईक यांच्याकडे होता. यामुळे आता वैभव नाईक देखील आता ठाकरेंची साथ अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिंदे गटाचे नेते गोगावले यांनी दोन एक दिवसांपूर्वीच वैभव नाईक देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ते देखील शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असे वक्तव्य केले होतं. यानंतरच वैभव नाईक यांच्यासह काही माजी आमदार-खासदार शिंदे गटात जातील, अशा चर्चा सुरू झाल्या. ठाकरे गटाचा कोकणातला महत्त्वाचा चेहरा वैभव नाईक ठाकरेंना राम राम करून शिंदे गटात जातील, असा दावा करण्यात येत आहे.
एकीकडे अशा चर्चांना उधाण आलेलं असतानाच वैभव नाईक यांनी शिंदे गटातील प्रवेशाबद्दल आणि गोगावले यांनी केलेल्या दाव्यावर भाष्य केलं आहे. त्यांनी, याबाबत खुलासा करताना, गद्दारी करणार नाही. आम्ही कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक राहू, असं वक्तव्य वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी शिवजयंती निमित्त शपथही घेत याबाबत खुलासा केला आहे.
तसेच सध्या राज्यात सुरू असणाऱ्या ऑपरेशन टायगरवर देखील निशाना साधला आहे. त्यांनी, आम्ही गद्दारी करणारे नाही. शिवाजी महाराजांच्या काळात काही लोकांनी गद्दारी केली. पण शिवजयंतीच्या निमित्ताने आज शपथ घेतो की, आम्ही गद्दारी करणार नाही. कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक राहू.
शिवसेना फुटीच्या वेळीच आम्हाला ऑफर होत्या. पण त्या ऑफर आम्ही स्विकारल्या नाहीत. त्या नाकारल्यानेच आज नुकसान झालं आहे. पण याचा आम्हाला अभिमान आहे. आता तशी ऑफर देखील आलेली असून आली तरी ती नाकारू, असेही वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी वैभव नाईक यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरही भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानेच दुर्दैवाने तो पडला. आता नवीन स्मारक होतं आहे. पण ते स्मारक चांगलं व्हावं. मजबूत व्हावं. स्मारकात कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये, अशी आपली इच्छा असून त्यासाठी पूर्ण सहकार्य राहील, असेही वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.