Udayan Raje : महायुतीच्या चार मंत्र्यांकडे उदयनराजेंची मिश्किल मागणी; म्हणाले, ‘...तर मी उपोषणाला बसणार’

Jaykumar Gore Meet Udayan Raje : सातारा जिल्ह्याला एक नाही, तर चार मंत्रिपदाची संधी मिळाली आहे, त्या पैकी जयकुमार गोरे हे एक आहेत. आम्ही आज पदावर आहोत. पण आम्हाला कोणी ओळखत नव्हतं, तेव्हापासूनची आमची मैत्री आहे.
Jaykumar Gore- Udayan Raje
Jaykumar Gore- Udayan RajeSarkarnama
Published on
Updated on

Satara, 26 December : महायुतीच्या चार मंत्र्यांकडून आपल्याला एक चांगली पार्टी मिळावी, अशी मिश्किल अपेक्षा साताऱ्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी ही अफलातून विनोदी मागणी केली.

जयकुमार गोरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी (Udayanraje) ही मिश्किल मागणी प्रसारमाध्यमांसमोरच बोलून दाखवली. मी तर कालपासून काळा ड्रेस घालून बसलो आहे. त्यांनी मला विचारले,‘आज काळा ड्रेस’? त्यावर मी निषेधार्थ म्हणून सांगितले. आज आला नाही, तर म्हटलं मी उपोषणाला बसणार, त्यानंतर आज जयकुमार गोरे भेटायला आले, असा विनोदही खासदार उदयनराजे भोसले यांनी या वेळी केला.

ते म्हणाले, सातारा जिल्ह्याला एक नाही, तर चार मंत्रिपदाची संधी मिळाली आहे, त्या पैकी जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे एक आहेत. आम्ही आज पदावर आहोत. पण आम्हाला कोणी ओळखत नव्हतं, तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत जयकुमार गोरे यांनी वाटचाल केली आहे. दुष्काळी माण खटाव हिरवेगार करण्याचे काम गोरे यांनी केली आहे. महायुतीच्या आमदारांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवूनच वाटचाल केली आहे.

Jaykumar Gore- Udayan Raje
Uday Samant : मला आरोग्य मंत्रिपदाची ऑफर होती; पण... : उद्योग मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट

कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करावी, यासाठी मी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गेलो होतो. माण, खटाव, खंडाळा या भागातील लोकांनी कामासाठी मोठ्या शहराकडे स्थलांतर केले. पण आज महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांनी आता या भागात कारखानदारी आणावी. त्यातून मागील काळात सातारा सोडून गेलेले लोक परत आले पाहिजेत. जन्मभूमी ही सर्वांची कर्मभूमी ठरावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार असे सांगितले जात होते. पण, महाविकास आघाडी सत्तेत कशी येणार मला सांगा. कारण, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीच्या तत्कालीन आमदारांनी कष्ट केले म्हणून आज महायुती सत्तेत आली आहे. ना भूतो ना भविष्यती असा हा निकाल लागला आहे. या यशामुळे सातारा जिल्ह्याचा कायापालट होणार, यात कोणाच्याही मनात शंका नाही, असा दावाही उदयनराजेंनी केला.

Jaykumar Gore- Udayan Raje
Girish Mahajan politics: नाशिकचे पालकमंत्री कोण? यावरून सुरू झाली रस्सीखेच

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल एकतर्फी लागेल

महायुतीमधील आमदार आणि नेतेमंडळींचं बॉडिंग असं झालं आहे की, हे लोक जोपर्यंत आम्हाला आता बास, कंटाळा आला आहे, असे म्हणत नाही. तोपर्यंत हे लोक एकमेकांना धरून राहिले तर काहीच अडचण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा निकाल तुम्हाला एकतर्फीच पहायला मिळेल, असा विश्वासही उदयनराजेंनी बोलून दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com