Jayant Patil : ‘शिवरायांची वाघनखं एवढ्या गुप्ततेत का आणली? मुंबईपासून साताऱ्यापर्यंत वाजत गाजत आणायला हवी होती’

Solapur NCP Melava : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा म्हणणं आहे की, खरी वाघनखं साताऱ्याच्या जल मंदिरात आहेत. मात्र, लंडनवरून आणलेली वाघनखं एवढ्या गुप्ततेत का आणली गेली? मागच्या दाराने ही वाघनखं का आणली.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 July : लंडनवरून आणलेली शिवरायांनी वापरलेली वाघनखं एवढ्या गुप्ततेत का आणली गेली? मागच्या दाराने ही वाघनखं का आणली गेली. वास्तविक वाघनखांचे स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत वाजत गाजत करायला हवं होतं. सरकारने ही वाघनखं भाड्याने आणली आहेत, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी सरकारच्या वाघनखं आणण्याच्या कृतीवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आज सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या मेळाव्यातून ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोलापुरात आले आहेत. त्या वेळी ते बोलत होते.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचं म्हणणं आहे की, खरी वाघनखं साताऱ्याच्या जल मंदिरात आहेत. मात्र, लंडनवरून आणलेली वाघनखं एवढ्या गुप्ततेत का आणली गेली? मागच्या दाराने ही वाघनखं का आणली गेली. साताऱ्याच्या संग्रहालयात ती वाघनखं पोहोचलीसुद्धा. वास्तविक वाघनखांचे स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला हवा होतं. पण तसं काही दिसत नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, साताऱ्याच्या संग्रहालयात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे वाघनखं सर्वांसाठी खुली करणार आहेत. त्यालाही सरकारने तिकीट लावले आहे. सरकारने आणलेली वाघनखं ही भाड्याने आणली आहेत. ती वाघनखं मिळवलेली नाहीत. तर ती तात्पुरत्या स्वरूपात आणलेली आहेत.

वाघनखांबाबत सर्वांनाच आदर आहे. पण, वाघनखं आणण्याचा प्रकार हा वाजत गाजत व्हायला पाहिजे होता. संग्रहालयाच्या समोरच्या दाराने व्हायला पाहिजे होता. ती वाघनखं संग्रहालयाच्या मागच्या दाराने गुपचूप नेऊन ठेवण्यात आले आहेत, अशा शब्दांत जयंत पाटील शिवारायांच्या वाघनखावरून सरकारवर टीकास्त्र सोडले.

Jayant Patil
Mahendra Dalvi VS Jayant Patil : जयंत पाटलांना शिंदे गटाचा खोचक सल्ला; ‘शेकाप आता कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षात विलिन करावा’

‘....हे तर सरकारचे फेल्युअर’

विशाळगडावर घटडलेल्या घटनेबाबत जयंत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, विशाळगडाच्या पायथ्याला घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. पायथ्याला असलेल्या लोकांना वर जाऊ न दिल्याने त्यांनी तेथील धार्मिक स्थळावर हल्ला केला. तेथील लोकांची घरदारं फोडून, तिजोऱ्या लुटून त्यातील संपत्ती नेली. हे शिवप्रेमींचे लक्षण नसून पुण्यातील किंवा कुठूनतरी वेगळ्या ठिकाणावरून आलेले गुंड आहेत. अशा पद्धतीने कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल. त्यामुळे सरकारचे हे मोठं फेल्युअर आहे.

Jayant Patil
Solapur NCP Melava : राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून जयंत पाटील फुंकणार विधानसभेचे रणशिंंग; ‘शहर मध्य अन उत्तर’बाबत काय बोलणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com