Aditya Thackeray : काका-पुतणे निवडणूक आयोगावर तुटून पडले; देशात लोकशाहीचे ढोंग म्हणत, आदित्य ठाकरेंची टीका!

Election Commission Voter List Controversy : अलिकडच्या काळात भारताच्या निवडणूक आयोगाने मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेतल्या नाहीत. आपण आता सर्वात मोठे लोकशाही राहिलेलो नाही.
Aditya Thackeray -Raj Thackeray Attack On Election Commission News
Aditya Thackeray -Raj Thackeray Attack On Election Commission NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली.

  2. दोघांनीही मतदार याद्यांतील घोळ तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे.

  3. "घोळ मिटवा, मग निवडणुका घ्या," असा कडक इशारा ठाकरे काका-पुतण्यांनी दिला आहे.

Maharashtra Election Commission : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येणार या कल्पनेने मराठी माणूस सुखावला आहे. जे कधी एकमेकांकडे पहात नव्हते ते दोघे आता एकमेकांच्या घरी जाऊ लागले, एकाच गाडीतून फिरू लागले हे चित्र राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड दिलेल्या महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. यामागे निवडणुक आयोगाचा भोंगळ कारभार आणि सत्ताधाऱ्यांचा दबाव हे कारण असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वोट चोरीचा मुद्दा काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी काढला आणि राज्यात महाविकास आघाडीसह सगळे विरोधक एकवटले. राज्य व केंद्राच्या निवडणूक आयोगावर सगळे विरोधक तुटून पडलेले असताना राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या काका पुतण्यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीत उपस्थित केलेल्या मुद्यांनी अधिकाऱ्यांना घाम फोडला. तर आदित्य ठाकरे यांनी आपण आता सर्वात मोठी लोकशाही असलेलो राहिलेलो नाहीत, तर लोकशाहीचे ढोंग करणारे ठरत आहोत, असा हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या संदर्भात 'एक्स'वर प्रतिक्रिया व्यक्त करताना निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. अलिकडच्या काळात भारताच्या निवडणूक आयोगाने मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेतल्या नाहीत. आपण आता सर्वात मोठे लोकशाही राहिलेलो नाही, आपण लोकशाहीचे ढोंग करणारे सर्वात मोठे आहोत आणि हाच खरा मुद्दा आहे.

Aditya Thackeray -Raj Thackeray Attack On Election Commission News
Raj Thackeray News : 'मविआ'च्या पत्रकार परिषदेतही राज ठाकरेंचीच छाप! निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे काढले

महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ते येत्या महानगरपालिका आणि स्थानिक निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंत नोंदणीकृत मतदार याद्या वापरणार आहेत. प्रथम, यामुळे 18 वर्षांचे (जुलै 2025 नंतर जेव्हाही निवडणुका होतील) वयाच्या तरुणांना पहिल्यांदाच मतदार म्हणून मतदान करण्याचा अधिकार नाकारला जातो. दुसरे म्हणजे, विरोधी पक्षांनी मतदारांची फसवणूक उघड करण्यासाठी याद्या तयार केल्या आहेत.

Aditya Thackeray -Raj Thackeray Attack On Election Commission News
Aditya Thackeray : 'फक्त आश्वासन...'; CM फडणवीस अन् पंतप्रधान मोदींच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

आयोग एका पक्षासाठी आहे का?

महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात हजारो बनावट मतदार आहेत. डुप्लिकेट मतदार, चुकीचे EPIC क्रमांक, एकाच फोटो आयडी वापरणारे अनेक मतदार, एकाच घरात अनेक मतदार (188 पर्यंत) राहतात. असे दिसते की निवडणूक आयोग फक्त एकाच राजकीय पक्षासाठी काम करतो, अन्यथा या मतदार याद्या साफ करणे हे त्यांचे काम आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने डुप्लिकेट आणि बनावट मतदार आहेत. निवडणूक खरोखरच मुक्त आणि निष्पक्ष होईल का? आम्ही केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि काही मागण्या केल्या आहेत. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मतदार याद्या स्वच्छ आणि संक्षिप्तपणे पुन्हा एकदा तपासल्या जाव्यात. राजकीय पक्षांना आक्षेप घेण्यासाठी दिलेली 8 दिवसांची नोटीस मागे घ्यावी आणि निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांनी संयुक्तपणे ही प्रक्रिया राबवावी.

केवळ नक्कल न केलेल्या आणि शुद्ध मतदार यादीसह निवडणुका घ्याव्यात.अन्यथा महाराष्ट्राचा आवाज ऐकला जाणार नाही. तुम्ही कोणत्याही राजकीय विचारसरणीचे असाल, परंतु तुमच्या मताचे मूल्य आहे. कारण ते खऱ्या मानल्या जाणाऱ्या मतदार यादीत येते. मतदार यादीत लाखो बनावट मतदार असल्याने, तुमच्या मताला आवाज नाही, लोकशाही पाळली जात नाही, असा थेट हल्ला आदित्य ठाकरे यांनी चढवला आहे.

5 FAQs

  1. प्रश्न: राज आणि आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका का केली?
    उत्तर: मतदार याद्यांतील अनियमितता आणि नागरिकांच्या नावांचा गैरहजेरी यावर त्यांनी संताप व्यक्त केला.

  2. प्रश्न: ठाकरे दोघांनी एकत्र येऊन विधान का दिलं?
    उत्तर: निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि मतदारांची अन्याय्य वगळणी थांबावी यासाठी त्यांनी संयुक्त भूमिका घेतली.

  3. प्रश्न: त्यांनी आयोगाकडे कोणती मागणी केली आहे?
    उत्तर: मतदार याद्यांतील चुका तातडीने दुरुस्त करूनच निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

  4. प्रश्न: या विषयावर निवडणूक आयोगाने काही प्रतिक्रिया दिली का?
    उत्तर: आयोगाने या आरोपांवर तपास सुरू असल्याचे सांगितले असून आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.

  5. प्रश्न: ठाकरे कुटुंबातील या संयुक्त भूमिकेचे राजकीय महत्त्व काय आहे?
    उत्तर: अनेक वर्षांनंतर ठाकरे घराण्याचे दोन वेगळे गट एका मुद्यावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com