

Rajya Sabha Elections News : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांमध्ये रस्सीखेच आहे. प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? याची चर्चा सुरू असताना अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, राजन विचारे यांची नावे देखील उमेदवारीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी या नेत्यांमध्ये रस्सीखेच आहे.
महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहात केवळ एक उमेदवार विजयी होणार आहे. त्यामुळे ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार की काँग्रेसला यासाठी बैठका सुरू आहेत. शरद पवार हे देखील राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. पुन्हा राज्यसभेवर जाण्याबाबत त्यांनी अजून उघड भूमिका घेतली नाही. मात्र, त्यांच्या उमेदवारीसाठी जयंत पाटील, शशिकांत शिंदे हे अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवर उमेदवारी कोणाला मिळणार हे ठरणार आहे.
शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीत त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर आहे. शरद पवार निवडणुकीच्या मैदानात उतरले नाही तर उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषदेची जागा सोडून राज्यसभेची जागा आपल्याकडे ठेवण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.
आपल्याकडे सर्वाधिक 20 आमदार आहेत त्यामुळे उमेदवारी आपल्या पक्षाला मिळावी, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आहे. आदित्य ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदी यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. राज्यसभेच्या जागेबाबात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. मात्र, आदित्य ठाकरे यांनी या बैठकीला दांडी मारली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.