Chhagan Bhujbal On Sharad Pawar : पवारांचा तो दावा भुजबळांनी खोडून काढला ; म्हणाले, "मीच येवल्याची निवड .."

Maharashtra Political Crisis : बंड मी घडवून आणलेले नाही, ते तुमच्या घरातून सुरू झाले’
Chhagan Bhujbal, Sharad Pawar
Chhagan Bhujbal, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. शनिवारी नाशिकच्या येवल्यातून त्यांनी राज्यव्यापी सभेला सुरुवात केली.

या सभेत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत पराभूत झाल्यानंतर भुजबळांनी मी येवला मतदारसंघातून उमेदवारी दिली, असे पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या या विधानाला भुजबळांनी रविवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. भुजबळांनी यावेळी काही गौप्यस्फोट केलं. ते म्हणाले, "शरद पवार साहेबांनी मला येवल्याला पाठवलं नाही, मीच येवल्याची निवड केली.येथे संघर्ष केला, येथील जनतेने प्रेम दिलं, याठिकाणी चार वेळा निवडून आलो,

" ६५ वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं, ही सगळी मंडळी तुम्हाला सोडून गेलीत, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल का गेले, हे सर्व सगळं भूजबळांनी घडवून आणलं असं पवारसाहेबांना वाटतं, पण ही चुकीची कल्पना आहे, असे भुजबळ म्हणाले. पवारांना राजीनामा मागे घ्यायचा होता, तर मग राजीनामा का दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Chhagan Bhujbal, Sharad Pawar
Sanjay Raut on Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा पचका झाला..,ढोंग उघडे पडले ; राऊत म्हणाले, "‘देशबुडव्यांच्या हाती महाराष्ट्र..’

भुजबळ म्हणाले, "शरद पवार साहेब तुम्ही येवल्याला का आलात, हे मला कळलच नाही. मी ओबीसी आहे, म्हणून आलात का?. अहो हे बंड मी घडवून आणलेले नाही, ते तुमच्या घरातून सुरू झाले’

भुजबळ म्हणाले, "अलीकडे ज्या चर्चा झाल्या त्या सर्व चर्चांमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हेच होते. मी नव्हतो. तुम्ही हे सर्व केलं, तर मला दोष देऊन काय उपयोग आहे. या सर्वात ५४ आमदारांच्या सह्या होत्या. यात जयंत पाटील, रोहित पवार, यांच्याही सह्या होत्या. पण आमदांरांनी मी ज्येष्ठ आहे म्हणून मला बोलायला सांगितलं. साहेबांच्या घरातच, साहेब, अजित दादा आणि सुप्रिया ताई यांचं ठरलं. साहेब म्हणाले, मी राजीनामा देणार तुम्ही काय करायचं ते करा,"

Chhagan Bhujbal, Sharad Pawar
BJP leaders join BRS : भाजपच्या माजी नगरसेवकांचा बीआरएस मध्ये प्रवेश ; केसीआर यांचे सोलापुरकरांना मोठे आश्वासन..

किती जणांची माफी मागणार ?

"मी माफी मागतो. भुजबळांना उमेदवारी देऊन माझी चुक झाली," असे पवार म्हणाले होते. त्याला भुजबळांनी आज उत्तर दिलं. "मला उमेदवारी दिल्याने येवला मतदारसंघाचा विकास झाला आहे. २००४ मध्ये मी येवल्यातून निवडणूक लढवली, तेव्हा येवल्याचे लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी या मतदारसंघाचा विकास झालेला नाही. त्यामुळे तुम्हे येवल्याला या, अशी विनंती केली होती. माझ्यापुढे जुन्नरसह विविध मतदारसंघांचा पर्याय होता. आता या मतदारसंघाचा विकास झाला आहे, त्यामुळे चार वेळा मतदारांनी मला निवडून दिले आहे, त्यासाठी माफी मागण्याचा काहीच विषय नाही. तुम्ही कुठे कुठे किती जणांची माफी मागणार," असा प्रश्न त्यांनी पवारांना केला.

मला हेच कळलं नाही की ते का आले. मला वाईट वाटलं की तुम्ही माफी मागताय. तुम्ही अशी किती ठिकाणी माफी मागणार आहात. ५० ठिकाणी? गोंदियापासून , पुण्यापासून बीडपर्यंत तुम्ही माफी मागणार आहात का? कशासाठी माफी मागता, असा टोला भुजबळांनी लगावला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com