Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांनी केली सरकारची 'कोंडी'

Balasaheb Thorat on Maharashtra Government : राज्य शासनाने दिलेले आश्वासन कृतीहीन ठरल्याने काँग्रेस नेते थोरात संतापले. नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक हा नागरिकांसाठी एक जीवघेणा खेळ बनत चालला आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat : राज्य शासन नागरिकांच्या गंभीर प्रश्नाबाबत किती असंवेदनशील आहे याचा नमुना आज दिसला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात या विषयावर सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले.

नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक हा नागरिकांसाठी एक जीवघेणा खेळ बनत चालला आहे. शहापूर परिसरातील प्रचंड वाहतूक कोंडी त्याला कारणीभूत ठरली आहे. या संदर्भात आज काँग्रेस आणि ते थोरात यांनी अतिशय संतप्त भावना सभागृहात मांडल्या.

नाशिक मुंबई महामार्गावरील प्रवास तीन तासांचा होता. गतवर्षी वाहतूक कोंडीने याबाबत प्रचंड तक्रारी होत्या. नाशिक ते मुंबई हा प्रवासाचा आठ ते दहा तासांचा झाला आहे. नागरिकांचा प्रचंड संताप होत आहे.

गतवर्षी देखील सभागृहात हा विषय मांडण्यात आला. त्यावर ३१ मार्चपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिले होते. ही मुदत संपूनही प्रश्न सुटलेला नाही. वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे.

Balasaheb Thorat
Nilesh Lanke : कांदा महायुतीला पुन्हा रडवणार? खासदार लंके आक्रमक; महाविकास आघाडीचे 'वादळ' नगरमध्ये धडकणार

याबाबत सरकारने गतवर्षी दिलेले आश्वासन फोल ठरल्याचे थोरात यांनी सप्रमाण दाखवून दिले. त्याला अन्य सदस्यांनी ही पाठिंबा दिला. शहापूर जवळ थोरात स्वतःच या वाहतूक कोंडीत अडकले होते. यावेळी जवळपास दहा किलोमीटरची रांग होती. एका ठिकाणी तास-तास भर थांबावे लागत असल्याचा संताप थोरात यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाने कोणतीही पर्याय व्यवस्था न करताच येथील कामे सुरू ठेवली आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये राज्य सरकार विषयी प्रचंड संताप आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवा अन्यथा नागरिकांचा रोष वाढत जाईल असा इशारा यावेळी थोरात यांनी दिला.

Balasaheb Thorat
Raju Shetti : दूध दराविषयी राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप

नाशिक मुंबई वाहतूक कोंडीचा हा विषय गेली दोन वर्ष सातत्याने मांडला जात आहे. त्यावर अनेक नेत्यांनीही तक्रारी केल्या होत्या. मात्र काहीही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. या मार्गावरून रोज लाखो वाहनांची जा- ये होते.

वाहतूक कोंडीने समस्येत मोठी भर टाकली आहे. त्यातून सगळ्यांनाच आर्थिक आणि मानसिक शोषण होत असल्याचा अनुभव वाट्याला येत आहे. आज हा प्रश्न आणि वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांच्या भावना काँग्रेस नेते थोरात यांनी विधानसभेत मांडल्या सरकारनेही त्यावर तातडीने कार्यवाहीचं आश्वासन दिले. हे आश्वासन तरी पाळले जाते का? हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com