
Mumbai News: मस्साजोग गावचे (बीड) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिवसेंदिवस गंभीर वळण घेत आहे. त्याची धग थेट मुख्यमंत्री फडणवीस यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. काल जळगाव येथे आलेल्या फडणवीस यांना त्यावर बोलावे लागले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. या विषयावर विधिमंडळापासून तर रस्त्यावर राजकारण आणि संताप व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी काही दिवस पोलीस आणि राज्य सरकारला त्रस्त करणार असे संकेत आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या खासदार स्मिता वाघ यांच्या कन्येच्या विवाहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल जळगावला आले होते. यावेळी विमानतळावर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना देशमुख हत्याप्रकरणी प्रश्न विचारले. या हत्ती प्रकरणात पोलिसांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवरही टीका करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणी मी कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. राज्यात कायद्याचे राज्य आहे बीडच्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. येणाऱ्या काळात तुम्हाला दोषींवर कठोर कारवाई झाल्याचे दिसेल.
बीडमध्ये जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे. त्या प्रकरणाची तटस्थपणे चौकशी सुरू आहे. मी कोणालाही पाठीशी घालणार नाही. जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा करणार. बीडमध्येच नव्हे तर, राज्यातही कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. असे स्पष्टीकरण यावेळी फडणवीस यांनी दिले.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारला त्यानंतर लगेचच राज्यभरात काही अप्रिय घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे सध्याचे चित्र आहे. या प्रकरणात सरपंच देशमुख यांची हत्या व त्या हत्येचे विधिमंडळात सदस्यांनी सांगितलेले चित्रण संतापजनक आहे. या प्रकरणात थेट सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
संशयित आणि या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून उल्लेख होणाऱ्या संशयीताचे थेट संबंध मंत्रिमंडळातील सदस्यांशी आहेत. प्रकरणावर सर्वच विरोधी पक्षांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे या संदर्भात उद्या बीडमध्ये मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामुळे आणखी काही दिवस अर्थात आरोपी अटक होईपर्यंत या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापणार आहे हे स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.