Girish Mahajan : मुख्यमंत्र्यांनी संकटमोचकांना सांगावा धाडला, मात्र गिरीश महाजन राजकीय इव्हेंट, पक्ष प्रवेश सोहळे अन् बैठकांतच रमले, शेतकऱ्यांना दिलेला शब्द विसरले!

Kumbh Mela nmrda road expansion : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्याचे एकतर्फी रुंदीकरण होत असून एनएमआरडीए'ने शेकडो शेतकऱ्यांना देशोधडीला लावत बेघर केलं आहे.
Kumbh Mela nmrda road expansion  Issue cm devendra fadnavis And girish mahajan
Kumbh Mela nmrda road expansion Issue cm devendra fadnavis And girish mahajansarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणासाठी एनएमआरडीएने शेकडो शेतकऱ्यांना बेघर केले असून, शिंदेंच्या स्थगितीनंतरही कारवाई थांबवली नाही.

  2. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार मांडली होती, त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना समस्या जाणून घेण्याचे आदेश दिले होते.

  3. मात्र गिरीश महाजन नाशिकमध्ये येऊनही शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही, यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.

Girish Mahajan News : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्याचे एकतर्फी रुंदीकरण होत आहे. त्यासाठी 'एनएमआरडीए'ने शेकडो शेतकऱ्यांना बेघर केले. यासंदर्भात बारा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळा साठी त्रंबक रस्ता रुंद केला जात आहे. रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जागेव्यतिरिक्त दुतर्फा 100 मीटर जागा 'एनएमआरडीए' मोकळी करत आहे. सात दिवसांची नोटीस देऊन येथील बांधकामांवर एकतर्फी कारवाई झाली.

एनएमआरडीए आणि जिल्ह्याचे सबंध पोलीस व प्रशासन रस्ता मोकळा करण्यासाठी उतरले होते. दहशतीच्या जोरावर अगदी सरकारने मंजूर केलेली घरकुले आणि कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेली शेतकऱ्यांची घरे ऐन दिवाळीच्या तोंडावर पाडण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला तोंडी स्थगिती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशालाही एनएमआरडीएने नाही. शेतकऱ्यांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला. त्या विरोधात आंदोलन सुरू झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार हिरामण खोसकर आणि सरोज अहिरे यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार तसेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. शेतकऱ्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पाडकामाला स्थगिती देत दोन दिवसात कुंभमेळा मंत्र्यांनी घटनास्थळी भेट द्यावी अशा सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. कैलास खांडबहाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतिम निर्णय होईपर्यंत आपले साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नावर तोडगा निघेल असे सकारात्मक वातावरण तयार झाले होते.

Kumbh Mela nmrda road expansion  Issue cm devendra fadnavis And girish mahajan
Kumbh Mela Nashik : कुंभमेळा सुरू व्हायच्या आधीच ‘भ्रष्टाचाराची डुबकी?’ CCTV प्रकल्पावरून आम आदमी पक्षाचे गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांनी दिलेले दोन दिवसांचे आश्वासन दहा दिवस होऊ नये कुंभमेळा मंत्री शेतकऱ्यांकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. झालेल्या कारवाईत शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त आहे. कुंभमेळा मंत्री महाजन यांनी रन फॉर युनिटी कार्यक्रमात भाग घेऊन धावले. जळगावला माजी महापौर आणि नगरसेवकांचा पक्षप्रवेश त्यांच्या उपस्थितीत झाला. मुंबईत मंत्री समितीची बैठक झाली. अशा विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली.

मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात शेतकऱ्यांची भेट घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता येथील साखळी उपोषणाला बारा दिवस झाले. गेली दहा दिवस शेतकरी रोज मंत्र्यांची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र गिरीश महाजन यांना अद्याप वेळ मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी स्थानिक आमदारांशी वारंवार संपर्क केला. मात्र आमदारांच्या सांगण्यानुसार मंत्र्यांनी त्यांनाही केव्हा दौरा करणार हे सांगितले नाही. दौऱ्यावर येईल तेव्हा कळवतो, असा निरोप मंत्र्यांच्या कार्यालयातून आमदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे आमदारही हतबल झाले आहेत.

विविध राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांची घरे व इमारती पाडण्याला विरोध केला आहे. आज खोटी येथे रस्ता मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनाही शेतकऱ्यांनी हुसकावून लावले. एकंदरच शेतकरी मंत्री येतील या अपेक्षेने रस्त्याकडे डोळे लावून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी शेतकऱ्यांचा मेळावा होत आहे. त्यात काय निर्णय होतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

Kumbh Mela nmrda road expansion  Issue cm devendra fadnavis And girish mahajan
Kumbh Mela News : 'एनएमआरडीए' विरोधी आंदोलनात मनसेची उडी; गिरीश महाजन थेट टार्गेट

FAQs :

1. त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण प्रकरण काय आहे?
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी एनएमआरडीएने रस्त्याचे एकतर्फी रुंदीकरण सुरू केले आहे.

2. किती शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे?
शेकडो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी आणि घरांमधून बेघर करण्यात आले आहे.

3. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय आदेश दिले होते?
त्यांनी तोंडी स्थगिती दिली होती, मात्र कारवाई सुरूच ठेवण्यात आली.

4. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय भूमिका घेतली?
फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्याचे आदेश दिले.

5. गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला का?
नाही, त्यांनी नाशिकमध्ये येऊनही शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com