Operation Sindoor: साधू खुष... म्हणाले, पुन्हा आगळीक केली तर भारत पाकिस्तानला घरात घुसून धडा शिकवेल!

Mahant Sanjay Das; Saints in Ayodhya also praised Operation Sindoor -अयोध्येतील संकट मोचक सेनेचे प्रमुख महंत संजय दास यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे
Mahant Sanjaysdas
Mahant SanjaysdasSarkarnama
Published on
Updated on

India air strike News: भारतीय हवाई दलाने बुधवारी पहाटे पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये हल्ला केला. यामध्ये दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. त्यामुळे जगभर त्याचे पडसाद उमटले आहेत. अयोध्येतील साधूंनीही त्यावर आनंद व्यक्त करीत पाकीस्तानला इशारा दिला. https://sarkarnama.esakal.com/maharashtra/uttar-maharashtra/chhagan-bhujbal-the-country-is-with-the-indian-army-we-have-to-be-prepared-sd67

अयोध्येतील संकट मोचक सेनेचे प्रमुख आणि हनुमान गढी येथील महंत ज्ञानदास महाराज यांचे उत्तराधिकारी संजय दास यांनी भारतीय सैन्याच्या कारवाईचे स्वागत केले आहे. पाकिस्तान वरील एक कारवाई अत्यंत आवश्यक होती. या कारवाईमुळे भारतीय नागरिकांत भारतीय सैन्याचा अभिमान आणखी वाढेल, असे ते म्हणाले.

Mahant Sanjaysdas
Operation sindoor: छगन भुजबळ यांची सुचक प्रतिक्रीया, ... मात्र आपल्याला तयार रहावे लागेल!

पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. २८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशापुढे एक मोठे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. उत्तर देणे आवश्यक होते. पहलगाम हल्ल्याचा परिणाम म्हणूनच भारतीय हवाई दलाने ही कारवाई केली, असे महंत संजय दास म्हणाले

Mahant Sanjaysdas
Nashik Mock Drill: मॉक ड्रिल; नाशिकमध्ये आढळल्या त्रुटी, प्रशासनाची ऐनवेळी का झाली धावपळ?

यासंदर्भात भारतीय सैन्याने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे. नागरिकांमध्ये आपल्या सैन्याचा नेहमीच अभिमान बाळगला जातो. बुधवारी केलेल्या हवाई हल्ल्यामुळे हा अभिमान अधिक वाढेल, याबाबत संशय नाही.

पाकिस्तानी सरकार आणि लष्कराने या हल्ल्यापासून धडा घ्यावा. त्यांनी पुन्हा दहशतवाद्यांना प्रोत्साहन देऊन काही करण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास त्यांना भारतीय लष्कर आणखी गंभीर प्रत्युत्तर देईल. सहन करण्याची त्यांची क्षमता नसेल. पाकीस्तानने यापासून धडा घेऊन दहशतवाद्यांना पाठींबा देणे थांबवावा. अन्य काही आगळीक केली, तर पाकीस्तानला घरात घुसून भारतीय लष्कर धडा शिकवेल.

भारत हा सहिष्णू देश आहे. त्याचा चुकीचा अर्थ पाकिस्तानने घेतला आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना अतिशय क्रूर पद्धतीने मारले. माता भगिनींचे कुंकू पुसले. त्याला उत्तर मिळणारच होते. केंद्र सरकार आणि भारतीय लष्कराने हे उत्तर दिले, त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत, असे महंत संजयदास म्हणाले

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com