Raju Shetty On Manikrao Kokate : तर कोकाटे यांच्याही जमिनीचा व मालमत्तेचा लिलाव झाला पाहीजे, राजू शेट्टी कडाडले

Raju Shetti demands auction of Agriculture Minister Manikrao Kokate's land over Nashik DCC Bank loan : शेतकऱ्यांनी कर्ज थकविल्याने जिल्हा बॅंक अडचणीत असल्याचे सांगितले जाते. मग राजकीय नेत्यांनी कर्ज थकविल्यावर त्यांच्याकडून वसुली का केली जात नाही, त्यांच्या वसुलीला स्थगिती का दिली जाते? असे राजू शेट्टी म्हणाले.
Raju Shetti-Manikrao Kokate
Raju Shetti-Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Nashik DCC Bank News : नाशिक जिल्हा बॅंकेच्या कर्जवाटपात अनियमितता केल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह माजी संचालकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. माजी संचालकांवर १८२ कोटींची जबाबदारी निश्चित झाली आहे. त्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माजी संचालकांवर निशाणा साधला आहे. माजी संचालकांकडून वसुली होत नसेल तर वसुलीची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे द्या १८२ कोटी आम्ही वसुल करतो अशी हमीच राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राजू शेट्टी यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचाही यात समावेश असला तरी त्यांच्यावरही कारवाई झाली पाहीजे. कोकाटे यांच्याही जमिनीचा व मालमत्तेचा लिलाव व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारीही उपस्थित होते.

Raju Shetti-Manikrao Kokate
Chhagan Bhujbal : काकांकडून पुतण्याचं कौतुक, म्हणाले समीर एकटाच लढला तरी एवढी मतं...

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी कर्ज थकविल्याने जिल्हा बॅंक अडचणीत असल्याचे सांगितले जाते. मग राजकीय नेत्यांनी कर्ज थकविल्यावर त्यांच्याकडून वसुली का केली जात नाही, त्यांच्या वसुलीला स्थगिती का दिली जाते? ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव केला जातो त्याप्रमाणे नेत्यांच्याही मालमत्तेचा लिलाव करण्यात यावा असा सल्ला त्यांनी दिला.

नाशिक जिल्हा बॅंकेच्याबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. ते म्हणाले एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय नेत्यांशी संबधित असलेल्या साखर कारखान्यांना राज्य सरकार दोन हजार कोटींची हमी देते, परंतु अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ६३५ कोटी रुपये देण्यास सरकार तयार नाही. ही विषमता नाही तर काय आहे असा सवाल त्यांनी केला.

कांद्याला १ हजार रुपयांचा हमीभाव द्यावा

कांदा उत्पादकांच्या प्रश्नावरही राजू शेट्टी यांनी यावेळी बोट ठेवलं. ते म्हणाले, कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचं शहाणपण सरकारला फार उशीरा सुचलं. वेळीच निर्णय घेतला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. सरकारने चूक केली आहे. कांद्याला १ हजार रुपये इतका हमीभाव दिला जावा अशी मागणी शेट्टी यांनी केली.

Raju Shetti-Manikrao Kokate
Chhagan Bhujbal : शिवसेना सोडल्यावर १२ वर्ष कुणाशी बोललो नाही पण..; भुजबळांनी सांगितला शिवसेना फुटीचा जुना किस्सा

अजित पवारांवर साधला निशाणा

निवडणूकीच्या वेळेला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल असे आश्वासन सरकारने दिले होते. हे आश्वासन आता कुठल्याही स्थितीत सरकारने पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. राज्य डबघाईला जात असल्याची वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाऊक होती तरीही ही घोषणा करताना त्यांनी महायुतीला याबाबत सावध का केले नाही, असा सवाल उपस्थित करीत सत्ताधारी जातील तेथे आम्ही त्यांची वाट अडवू असा इशारा शेट्टी यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com