Uddhav Thackeray : अमित शाह, शिंदे, गुलाबराव पासून ते आयोग, आगामी निवडणुका.. ठाकरेंच्या भाषणातील १० ठळक मुद्दे..

Uddhav Thackeray : अब की बार नाही, आता आपटी बार..
Uddhav Thackeray :
Uddhav Thackeray :

Jalgaon News : जळगावमधील पाचोऱ्यात आज (दि.२३ एप्रिल) माजी मुख्यमंत्री व ठाकरे गट प्रमुथ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

1) शिवसेना पक्ष कुणाचा हे जर पाकिस्तानला जरी विचारलं ता ते पण सांगतील शिवसेना कुणाची. मात्र आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे समजत नाही. आयोगाचा धृतराष्ट्र झाला असेल, पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला माहिती आहे.

2) ठराज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील टोला लगावाला. सभेत घुसणार म्हणाले होते? अशा अनेक घुशी आम्ही पाहिल्यात. या घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार"

3) खरंच आज तात्यांची उणीव आहे. कणखर, खंदा, जिद्दी, मेहनती, विश्वासू सहकारी जाणे हे फार मोठ नुकसान असते. असे चाळीस गद्दार गेले तरी फरक नाही. मात्र एक विश्वासू माणूस गेला तरी, फार मोठा खड्डा असतो.

Uddhav Thackeray :
Sharad Pawar News : राज्यात पुन्हा नवीन समिकरण? पवार अन् प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत झाली 'ही' चर्चा

4) यांना ज्याप्रमाणे घोड्यावर बसवलं, तसं पुन्हाच खाली खेचूया, आता हीच ती वेळ आली आहे. निवडून आलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे माझ्यासोबत आहेत. ज्यांनी निष्ठेला डाग, कलंक लावला, हा कलंक तर आपल्याला धुवायचा आहे, पण ते कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाकायचं आहे.

5) आपले सरकारच्या वेळेस कोरोनाचं संकट आलं. हे संकट सरकारनिर्मित नव्हतं. चक्रीवादळांची आपत्ती देखील आली होती.

पण ज्या-ज्या वेळी संकट उभी राहत होती. त्या वेळी आपल्या सरकारची मदत मिळत होती का नव्हती? आता मात्र हे उलट्या पायाच सरकार स्वत:च एका संकट आहे. गारपीट होत आहे, अवकाळी पाऊस पडतोय, यांची मदत तुमच्यापर्यंत तरी पोहचतंय का?

6) सरकारविरोधी बोलेलो, खरं बोललं मागे पोलिस, यंत्रणा पडतात. पोलिसांना देखील सांगणं आहे की, तुम्ही शेतकर्‍यांची मुलं आहात. शेतकऱ्यांचं त्यांच्या दुखं मांडलं तर तुम्ही त्यांना आत टाकणार का?

Uddhav Thackeray :
Uddhav Thackeray : जळगावात ठाकरेंची खडसेंसाठी बॅटींग; "शिवसेनेला तोडायचं काम नाथाभाऊंच्या गळ्यात पण.. "

7) माझे वडील चोरतात, पण तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. तुमचे आशिर्वाद माझ्यासोबत आहे. आव्हान भाषा आम्हालाही येते. पण आमच्यापुढे भाजपचं आव्हान बिल्कुल नाही. भाजप सत्तेत असल्यामुळे देशाचं जे नुकसान होत आहे. या नुकसानीचं आव्हान माझ्यासमोर आहे, असे ठाकरे म्हणाले.

8) सत्यपाल मलिक यांनी सरकारला माहिती दिली. मात्र त्यांच्यामागे सीबीआय लावले. अमित शहा यांना विचारायचं आहे सीमेवर जवान शहीद होतात, पण तुम्हाला कर्नाटक निवडणुकीची चिंता लागलीये. आमच्यामागे इडी साीबीआय लावता, धाडी टाकता, मात्र हेच तुमच्याकडे आले की शुद्ध आणि आमच्याकडे असले की भ्रष्ट. यांना भाजप शिवाय केणताही पक्ष जिवंत ठेवायचा नाही, असेही ठाकरे म्हणाले.

9)एका कापूस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केली. लोकसंख्येच्या बाबतीत नंबर एक पण आत्महत्या करत असतील तर लोकसंख्येचं करायचं काय? नुसती धूळफेक चालू आहे. महागाई कमी झालं? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं का? य़ा थापा एकत आले. पण निवडणुका आल्या की पुन्हा अब की बार याचं सुरू होतं. पण अब की बार आपटा यांना, असे ठाकरे म्हणाले.

10) "२०१४ साली शिवसेना भाजप युती तुटली. एके दिवशी मला फोन नाथाभाऊंचा आला म्हणाले की, आपली युती तुटली.तेव्हा भाजपने हे काम नाथाभाऊंच्या गळ्यात टाकंल होतं की शिवसेनेला तोडा. आता नाथाभाऊंनाच त्रास देवून, भाजपमधून बाहेर काढलं. म्हणजे पक्षात डोईजड झाले की, वेगवेगळे आरोप करून पक्षातून काढून टाकायचं आणि इतर पक्षातील भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घ्यायचं, ही भाजपची नीती, अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com