
Nagpur News, 19 Sep : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे विदर्भ भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. सर्वाधिक आमदार भाजपचे निवडून आलेत. हे बघता स्थानिक निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला फारशा जागा दिल्या जाणार नाहीत असे बोलले जात आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भावर आमचाही हक्क आहे, असे सांगून स्थनिक निवडणुकीत तडजोड करणार नाही असे स्पष्ट करीत भाजपला इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर आज नागपूर येथे आयोजित केले आहे.
यासाठी खासदार, आमदार असे एकूण साडेपाचशे पदाधिकारी शहरात दाखल झालेत. पक्षाचा आढावा, पुढील वाटचाल, स्थानिक निवडणुकीची तयारी यावर या शबिरात मंथन केले जाणार आहे. या प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी विदर्भाच्या बालेकिल्ल्यावर प्रथमच आपले मत व्यक्त केले.
ते म्हणाले, प्रत्येक वेळी विदर्भ कोणाचा बालेकिल्ला राहील असे होत नसते. या पूर्वी हा प्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मी जेव्हा राजकीय जीवनात प्रवेश केलाय त्यावेळी काँग्रेस आय पक्षाने अनेक स्थानिक व नवे उमेदवार दिले होते. त्यावेळी अनेकांना आपण निवडून येऊ असे वाटले नव्हते.
जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही निवडून आला, प्रमाणपत्र घेऊन जा असे फोन करून सांगावे लागले होते. तेव्हा कुठे त्यांचा विश्वास बसला होता. हा संदर्भ देऊन अजितदादांनी भाजपच नव्हे तर सर्वच पक्षांना विदर्भावर कोणाची मक्तेदारी नाही असे सुनावले. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे निकाल लागतात. प्रत्येक जण आपापल्या परीने काम करतो.
आज भाजप देशपातळीवर मोठा पक्ष आहे. त्यांचे प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे प्रतिनिधित्व करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचे खासदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांचे वेगळ्या अपेक्षा आहेत. एकनाथ शिंदे यांचेही कार्यकर्ते आहेत. त्यांनाही जागा हव्या आहेत. सर्वांचा नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत संधी मिळाली पाहिजे.
नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे ही आमची सुध्दा भूमिका आहे असे सांगून अजित पवार यांनी महापालिकेच्या निवडणुकीत दोन चार जागेवर तडजोड केली जाणार नाही असा इशारा दिला. नागपूर महापालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. पंधरा वर्षांपासून सत्ता आहे. मागील निवडणुकीत 150 पैकी भाजपचे तब्बल 108 नगरसेवक निवडून आले होते.
या वेळी भाजपने 120 चे टार्गेट ठेवले आहे. हे बघता भाजपला किमान 140 जागा लढव्या लागतील. 11 जागा राष्ट्रवादी आणि शिंदे सेने साठी सोडल्या जातील. यामुळे महायुतीमध्ये नाराजी आहे. त्यापेक्षा युती करू नये असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या इशाऱ्याने जागावाटप करताना महायुतीत खडाजंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.