
Bachchu Kadu latest news : मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणासंदर्भातील असलेल्या जवळपास मान्य केल्या आहे. या मागण्यांना अध्यादेशाचं स्वरूप देखील आलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई जवळपास जिंकल्यात जमा झाल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलकांमध्ये आहे.
परंतु आपल्या आरक्षणाला धक्का लागत असल्याची भावना ओबीसींमध्ये बळावली आहे. यातून ओबीसी नेत्यांनी देखील शड्डू ठोकून मैदानात उतरले आहे. यातून मराठाविरुद्ध ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे. यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्यातील भाजप महायुती सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
बच्चू कडू भंडारा दौऱ्यावर आहेत. शेतकरी (Farmer) कर्जमाफीसाठी ते या महिन्याच्या शेवटी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. तत्पूर्वी ते महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीसाठी यात्रा काढणार आहेत. यातच राज्यात सुरू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षणावरून पेटलेल्या वादावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी राज्यातील भाजप महायुतीच्या काराभारावर नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्रातला राजकारणामध्ये कुठेतरी एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे, छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला न्यायालयात खेचण्याची भाषा बोलून दाखवली आहे. यावर बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, "गावागावात जाती-जातीत, धर्मावर वाद होऊ नये, ही खरी अपेक्षा आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपलं राजकीय कौशल्य वापरलं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही, हे राज्याचं दुर्दैव आहे."
'भाजपने ज्यापद्धतीने फोडाफोडीचं राजकारण वापरलं, जे कौशल्य वापरलं, ते या प्रश्नांमध्ये का वापरत नाही? यांच्याकडे काय कमी आहे. केंद्रात तुम्ही आहात, राज्यात तुम्ही आहात. कायमचा वाद मिटवा ना! पण तुम्हाला लढू द्यायचं आहे. ओबीसी मराठ्याची आग गावागावात लागली पाहिजे. हीच तुमची मानसिकता, असं वाटतं एकंदरीत, ती मानसिकता सोडून महाराष्ट्र कसा वाचेल? याचा सरकारने विचार करणं महत्वाचं आहे. कोणी कुणाच्या वाट्याचं घेतलं नाही पाहिजे आणि कोणी कुणाच्या वाट्याचं दिलं नाही पाहिजे', असे बच्चू कडू यांनी म्हटले.
बच्चू कडू यांनी कुठलंही सरकार हे शेतकरी शेतमजुरांसाठी नाहीच. प्रत्येकाने ओबीसी, मराठा, दलित, हिंदू, मुस्लिम असं म्हणून लढायचं. या राजकारणात व्यवस्थितपणे शेतकऱ्यांना बाजूला ठेवायचं असतं. हक्काची लढाई बाजूला ठेवायची आहे. राजकारण बाजूला ठेवायचं आहे. राजकारण जाती धर्मावर करायचं आहे, असा घणाघात केला. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या भावाला हमीभाव मिळत नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केलं हे त्यांनी सांगावं, असा म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
बच्चू कडू म्हणाले, "सर्वात जास्त मच्छीमार विदर्भात आहेत. त्यासाठी भाजप सरकारने काय केलं हे त्यांनी सांगावं. दिव्यांगांना 6 हजाराची मागणी केली असताना केवळ एक हजार रुपये वाढ केली. सरकार कोणासाठी आहे अब्जोपतींसाठी, करोडपतींसाठी आहे का? छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील सरकारच्या हमीभावात मोठी तफावत आहे. म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही हे यातून स्पष्ट होते."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.