
Chandrashekhar Bawankule News :राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा महायुती सरकारवर खुलासा करण्याची वेळ आली आहे. कोकाटे यांचे वक्तव्य दुर्दैवी असून सरकारच्यावतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे.
'कोकाटे यांनी असे वक्तव्य करायला नको होते. ते असे बोलले असतील तर आम्ही माफी मागतो.', असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
'अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. यावर कोणी राजकारण करू नये.', असा सल्लाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची असंवेदनशील यातून दिसून येत आहे. बहुमत असल्याने ते अरेरावीची भाषा करीत असल्याचेही सांगितले.
एका शेतकऱ्याने कर्जमाफी कधी होणार, असे विचारले असता कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, जे नियमितपणे कर्ज भरतायत त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट बघायची. पण कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असेही मंत्री कोकाटे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.