आंबेडकरांच्या रक्ताच्या वारसदारांनीच दलितांची दिशाभूल केली; राऊतांचा आरोप

नितीन राऊत (Nitin Raut) यांचा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर राग का?
Nitin Raut
Nitin Rautsarkarnama

खामगाव (बुलडाणा) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या रक्ताचा वारसदार मी नसलो तरी मी त्यांच्या विचारांचा वारसदार आहे. माझा हात जरी कापला तरी माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून 'जय भीम' हा आवाज ऐकू येईल, अशा शब्दांत राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज नाव न घेता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर तीव्र हल्ला चढवला.

काँग्रेस (Congress) हाच पक्ष दलितांच्या कल्याणासाठी काम करणारा पक्ष आहे. या पक्षाच्या पाठिशी सर्व दलित समाजाने उभे रहायला हवे, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले. खामगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे विदर्भ विभागीय अध्यक्ष गौतम गवई यांनी आयोजित केलेल्या आंबेडकरी कलावंत व मजूर यांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते. आंबेडकरी समाजाची दिशाभूल करणाऱ्या नेत्यांवर ते केवळ आंबडेकरी परिवाराचे सदस्य आहेत म्हणून विश्वास ठेवू नका, असे आवाहन राऊत यांनी केले. प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता ते भाजपला मदत करीत असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.

Nitin Raut
वीज पुरवठा खंडित करणार ; थकबाकीदारांना ऊर्जामंत्री राऊतांचा इशारा

"तथागत गौतम बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांनी मोठे पद देण्यास त्यांनी मनाई केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांना महत्वाची पदे द्या, असे कुठेही म्हटले नाही. माझ्या कुटुंबाची पूजा करा, त्यांना देव माना असे ना गौतम बुद्ध म्हणाले ना डॉ. आंबेडकर. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा मानणाऱ्या व्यक्तींनी केवळ आंबेडकरांच्या कुटुंबातील सदस्य आहे. म्हणून एखाद्या नेत्याला दैवत मानणे चुकीचे आहे. रक्ताचे वारसदार असलेले हे नेते पांघरूण घेऊन समाजाला चुकीच्या दिशेने नेत आहेत, असेही राऊत म्हणाले.

"रक्ताच्या वारसदारांना तुम्ही कधी 'जय भीम' म्हटले का? आणि असे म्हटल्यावर ते काय उत्तर देतात? हे तुम्हाला माहिती आहे का?, "असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. "तुम्ही कुणाकुणाला आंबेडकरांचे रक्ताचे वारसदार मानणार? आंबडेकरांना भाऊ आणि बहिणी होत्या. त्यांचेही वारसदार आहेत. आंबेडकरांच्या रक्ताच्या वारसदारांपेक्षा त्यांचे विचार मानणारे वारसदार हे महत्वाचे आहेत. मी डॉ. आंबडेकरांचा रक्ताचा वारसदार नसलो तरी माझा हात कापला तर त्यातून गळणाऱ्या प्रत्येक थेंबातून 'जय भीम' चा नारा ऐकू येईल," असेही राऊत यांनी सांगितले.

Nitin Raut
नितीन राऊतांनी दिला इशारा; म्हणाले, कामगिरी पाहूनच तिकीट दिले जाईल...

"प्रकाश आंबेडकर यांच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटीची वेळ मागितली. मात्र, त्यानी मला भेटीची वेळ दिली नाही. मात्र, भाजप नेत्यांनी वेळ मागितली तेव्हा त्यांना आंबडेकर यांनी वेळ दिली. यावरून तुम्ही सर्व काही समजून जा, "अशा शब्दात भाजप आणि आंबडेकर यांच्यात साटेलोटे असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com