Manoj Jarange News : जरांगेंचा फडणवीसांवर जीवे मारण्याचा आरोप; बच्चू कडूंचा सबुरीचा सल्ला, म्हणाले...

Bachchu Kadu Advise Jarange Patil : गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत.
Bachchu Kadu, Manoj Jarange
Bachchu Kadu, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : आंदोलन करताना मला वेळोवेळी जीवे मारण्याचे प्रयत्न झाले. आंदोलनात फूट पाडून सरकारने दिलेले 10 टक्क्यांचे आरक्षण घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयऱ्यांबाबत अमंलबजावणी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. माझा बळी हवा आहे तर मीच येतो सागर बंगल्याकडे, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांचा आक्रमकपणा पाहून माजी मंत्री बच्चू कडू यांनी जरांगेंना सबुरीचा सल्ला दिला आहे.

बच्चू कडू म्हणाले, मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) मराठा आंदोलनासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. या आंदोलनाला वेगळे वळण लागावे यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. मोठ्या आंदोलनाबाबत असे घडतच असते. त्याला मात्र त्यांनी बळी पडू नये. गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे, हे कायम लक्षात ठेवावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bachchu Kadu, Manoj Jarange
Manoj Jarange Live : 'सागर बंगल्यावर येतो, आता गोळ्या घाला' म्हणत मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

फडणवीसांवर आरोप करून जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहे. यावर बच्चू कडू (Bachhu Kadu) म्हणाले, कुणा एका व्यक्तिवर वैयक्तिक आरोप करून आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचेच होईल. आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. त्यांनी एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नये. खूप महिन्यांची मेहनत आणि कोट्यवधी लोकांचा विश्वास वाया जाण्याची शक्यता आहे. आंदोलनाला वेगळी दिशी देण्यासठी काही शक्ती काम करत असतील तर त्याला बळी पडू नये. आता त्यांनी मुंबईकडे जाऊ नये. त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा. लोकांचीही तीच मागणी आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो. त्यांच्या मोठ्या मेहनतीवर पाणी फिरू नये, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे, असेही कडू म्हणाले.

Bachchu Kadu, Manoj Jarange
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : पाटील... पाटील... दादा.. दादा...; जरांगेंना शांत करता-करता आंदोलकांची दमछाक

देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केला आहे. या आरोपांवर बच्चू कडूंनी सांगितले, पाटलांनी अशी कुठलीही भूमिका घेऊ नये. सरकारला सर्वांचाच जीव महत्वाचा असतो. मग तो जरांगे पाटलांचा असो वा फडणवीसांचा. आपण जीव घेण्यासाठी आणि देण्यासाठीआंदोलन केलेले नाही. यावर चांगला मार्ग कसा काढता येईल. यावर दोन दिवसांत चर्चा करू. आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी आता मोठी उंची गाठलेली आहे. त्यामुळे त्यांनी भावनिक होऊन घेतलेला निर्णय मागे घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले जरांगे पाटील

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला डॉक्टर किंवा पोलिसांकरवी मारण्यासाठी प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटालांनी केला. फडणवीसांना मराठा समाजाला मोठे होऊ द्यायचे नाही, त्यासाठीच बारस्करांच्या माध्यमातून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटते की हे शेतकऱ्याचे कालचे पोर मराठ्यांचा नेता होऊ पाहत आहे. मला नेत्या होण्याची हौस नाही, मराठा या नात्याने गोरगरीब लोकांसाठी मी आंदोलन करतोय. तुम्हाला माझ्या बळी हवाच असेल तर मीच तुमच्या सागर बंगल्याकडे येतो, घाला मला गोळ्या. पण मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा देत मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

Bachchu Kadu, Manoj Jarange
Jarange Vs Fadnavis : जरांगे-पाटलांचे गंभीर आरोप, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com