Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचे चंद्रकांत पाटलांना खोक्याच्या भाषेत सडेतोड उत्तर

Prakash Ambedkar News : राज्यातील नेते महापुरुष आणि समाजसुधारकांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.
Prakash Ambedkar, Chandrakant Patil
Prakash Ambedkar, Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : राज्यातील नेते महापुरुष आणि समाजसुधारकांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्योरोपांचे राजकारण रंगले आहे. भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू केल्या. शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिले नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्या वक्तव्यावर पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पाटील यांच्या या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला.

Prakash Ambedkar, Chandrakant Patil
Himachal Pradesh : सुखविंदर सिंग सुखू होणार नवे मुख्यमंत्री; थोड्याच वेळात होणार घोषणा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, " डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले किंवा भाऊराव पाटील यांनी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या. मात्र, पाटलांनी यांनी गोळवळकर, हेगडेवार यांचे नाव घेतल नाही. याचा अर्थ गोळवळकर आणि हेगडेवार यांनी लोकांकडून पैसे घेतले नाही. मात्र, आजच्या शब्दामध्ये खोक्याच्या भाषेत पैसे घेतले आणि स्वतःच्या संस्था उभ्या केल्या. याची कबुलीच चंद्रकांत पाटीलांनी दिल्यामुळे आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन करतो" असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड, भाजप नेते सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा, यांच्यानंतर पाटील यांनीही वादग्रस्त व्यक्तव्य केल्यामुळे भाजपच्या नेत्यांना झालय काय असा सवाल विचरला जात आहे. वादग्रस्त वक्तव्यांवरुन महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यपालांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे.

Prakash Ambedkar, Chandrakant Patil
Ajit Pawar : 'आपला 'हल्लाबोल' मोर्चा बघून सरकार पार हललंचं पाहिजे'

दरम्यान, पैठण येथील एका कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले होते, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू केल्या. शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिले नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोक होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत'', असे पाटील म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com