Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीचा आता काँग्रेसकडे ‘हात’

Prakash Ambedkar : अकोला येथे पक्षप्रमुख म्हणाले आपण ‘सीट शेअरिंग’ करून मोकळे होऊ. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात चर्चा पुढे जात नसल्याचे समोर आल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसपुढे महत्त्वाची मागणी केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क साधत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील ठरलेल्या जागेबद्दलची यादी देण्यात यावी, त्यावर एकत्र बसू आणि आपल्यापुरता निर्णय घेऊ, असे नमूद केले आहे. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशीही आपण याबाबत पत्रव्यवहार केल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे दिली.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीतील चर्चा पुढे जाताना दिसत नाही. आता वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेस पुढे हात करण्यात आला आहे. आम्ही एकीकडे शिवसेनेला म्हटले आपण सोबत बसू मात्र तेदेखील बसायला तयार नाहीत. त्यामुळे कुठेना कुठे हे संपले पाहिजे. त्यामुळे आपण आता काँग्रेसकडे ‘सीट शेअरिंग’ करायची मागणी केली असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतील तीनही पक्षात 15 मतदारसंघांच्या जागेवरून वाद आहे. भांडण आमचे महाविकास आघाडीशी नसून त्यांच्यातच आपापसात भांडण सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar News: चर्चा फिस्कटल्यास, वंचितचा 'बी-प्लॅन' तयार

आता आम्ही काँग्रेसकडे मागणी केली आहे. रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क करून आपण आपल्यात ‘सीट शेअरिंग’ करून घेऊ, याबाबत मल्लिकार्जुन खर्गे यांनासुद्धा पत्र पाठविण्यात आल्याचे आंबेडकर या वेळी म्हणाले. आम्ही लेखी देऊनही अद्यापही कोणतेही उत्तर आले नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उत्तराची वाट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसला भुरटे चोर म्हणालो, यावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर देताना म्हटले की, जेव्हा एखाद्या डाकूला पकडायचे असेल तर सर्व भुरटे चोरांनी एकत्र यायला पाहिजे. यामध्ये आमचापण समावेश केला होता. असे नाही की आम्ही काँग्रेसला ‘टार्गेट’ केले होते, असेही आंबेडकर म्हणाले.

काँग्रेस आणि शिवसेनेत लोकसभेच्या 22 आणि 23 अशा जागेवरून सध्या वाद चालू आहे. एक पक्ष म्हणताे आम्हाला 23 जागा, तर दुसरा भलतेच म्हणतो. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे त्यांच्याच पक्षाची वकिली करू शकत नाहीत, तर ते आमच्या पक्षाची वकिली कशी करणार? अशी परिस्थिती असल्याचे एका प्रश्नाचे उत्तर देताना आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी टोला लगावला. चंद्रहार पाटील हे शिवसेनेत जरी गेले असले तरी काँग्रेस ती जागा सोडायला तयार नाहीत. काँग्रेसने आपल्याला ही बाब खासगीत सांगितल्याचा दावाही आंबेडकरांनी केला. त्यामुळे चंद्रहार पाटील यांचा बळी जात आहे का? अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपचे 400 खासदार जर निवडून आले तर संविधान बदलले जाण्याची भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. आंबेडकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी भाजपचे माजी मंत्री आरएसएसचे अनंत हेगडे यांनी बंदद्वार संघ कार्यकर्त्यांसमोर चर्चा केली. भाजपचे चारशे खासदार जिंकले तर वर्षभरात संविधान बदलू, असे विधान त्यांनी केले आहे. हे विधान आता सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. नरेंद्र मोदी हे ओबीसी असले तरी त्यांच्याकडूनच हे संविधान बदलण्याचा घाट घालण्याची सुरुवात झाल्याचा दावाही आंबेडकरांनी केला. आमच्या पक्षाला याची अगोदरच जाणीव झाली आहे की, ईस्ट इंडिया कंपनी जशी ‘बॅकडोअर’ आली व हुकूमशहा बनली, तसाच प्रकार भाजप करीत आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

R

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar News : काँग्रेसमधील सुपारीबाज नेते कोण? आंबेडकरांचा निशाणा कुणावर?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com