सत्ता गेल्याने फडणवीस वैफल्य ग्रस्त; आदित्य ठाकरे प्रथमच आक्रमक

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका.
Aditya Thackeray, Devendra Fadnavis
Aditya Thackeray, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

चंद्रपूर : महाराष्ट्रात सरकार कुठेच दिसत नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते. त्यावरुन शिवसेनेचे नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच जहरी टीका केली.

आदित्य ठाकरे आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यांवर होते. यावेळी ते म्हणाले, ''फडणवीस यांना सत्ता नसल्यामुळे वैफल्य आले आहे. त्यामुळेच ते कधी मुख्यमंत्र्यांवर बोलतात तर कधी सरकार कुठेच दिसत नाही, असे म्हणत असतात. त्यांना आपले सरकार येईल आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन, असे सतत वाटत असते. ही त्यांची उद्‌विग्नता आहे,'' असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

Aditya Thackeray, Devendra Fadnavis
मोदींचा अहंकार उतरवण्यासाठी उत्तर भारतीय यूपीच्या नातेवाईकांना एक लाख पत्र पाठवणार

''लोकांचा विश्वास महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) आहे. सरकार कसे काम करत आहे हे सगळ्यांना दिसत आहे. मात्र, जे डोळे बंद करुन फिरत आहेत. त्यांना ते दिसनारच नाही, असा टोला त्यांनी भाजपला लावला. खासदार संजय राऊत यांच्या विषयी प्रश्न विचारला असता आदित्य म्हणाले, ते वेगवेगळ्या राज्यामध्ये पक्षाचा प्रचार करत आहेत. शिवसेना आणि सत्तेतील तिन्ही पक्ष त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. मिळून अन्यायाविरुद्ध लढा देऊ,'' असेही आदित्य यांनी स्पष्ट केले.

नियमीत नेत्यांवर टीका करणे आदित्य ठाकरे टाळत असतात. मात्र, आज त्यांनी फडणवीसांवर टीका करत त्यांना जोरदार प्रत्यूत्तर दिले. त्यामुळे याची चर्चा राजकीय वर्तुळत रंगली आहे. आदित्य आज चांगलेच आक्रमक झाल्याचे पाह्यला मिळाले. गोवा निवडणुकीच्या प्रचारतही त्यांनी शनिवारी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.

Aditya Thackeray, Devendra Fadnavis
लाडांची जीभ घसरली; पटोलेंचा एकेरी उल्लेख करत 'सागर'वर येण्याचे दिले आव्हान

फडणवीस काय म्हणाले होते?

आदित्य ठाकरेंना इतिहास माहिती नाही. याआधी भाजप सोबत असताना पूर्ण ताकदीनिशी शिवसेना गोव्यात उतरली होती. मात्र, गोव्याने प्रत्येक वेळी शिवसेनेला नाकारले. अशी कोणती निवडणूक आहे जिथे भाजप लढत आहे म्हणून ते लढले नाहीत? गेली २०-२५ वर्ष हे लोक लढत आहेत. मात्र, त्यांचे डिपॉझिट कधीच वाचत नाही. इतिहास विसरून हे लोक बोलतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com