
Aditya Thackerays Response to Raj Thackeray's Remarks : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अन् सर्वसामान्यांमध्येही सर्वाधिक चर्चेचा विषय जर कुठला असेल, तर तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंच्या साद - प्रतिसादाचा. हे दोघेही जण पुन्हा एकत्र येतील, असे अंदाज वर्तवले जात आहेत. शिवाय, तशाच काही प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
मात्र सध्या तरी याबाबत केवळ अंदाजच वर्तवले जात असताना, आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र अन् ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना यावर एक सूचक विधान केल्याचं समोर आलं आहे. ज्यानंतर आता चर्चांना अधिकच उधाण आलेलं दिसत आहे.
आदित्य ठाकरेंना जेव्हा विचारण्यात आले की, राज ठाकरेंनी जी साद घातली आहे, त्याला प्रतिसाद देखील उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे. तुमचं काय मतं आहे? यावर आदित्य ठाकरे म्हणाले, ''साद-प्रतिसादला आम्ही वाद नाहीत. एवढंच सांगतो.''
तसेच, '' तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो, मला वाटतं दोन पक्ष प्रमुखांनी जे काही बोलायचं होतं. ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे. त्यामुळे आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही.''
एकनाथ शिंदे संतापलेले दिसत आहेत? यावर मिश्किलपणे हसत आदित्य ठाकरे म्हणाले, ''मला वाटतं गावाचं त्यांचं त्यांनी काही जास्त दिवस वाढवून घेतलं आहे.'' याचबरोबर तापमान वाढलंय असं वाटतं का? ''तापमान वाढलंय पण, चंद्र कुठं आहे हे बघून आणखी दोन दिवस ते गावात काढत आहेत.''
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.