
Mumbai News : अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणाला आज मोठा ट्विस्ट मिळाला. याप्रकरणी गुरूवारी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान अक्षयच्या आई-वडिलांनी ही केस आता लढायची नाही, अशी धक्कादायक भूमिका मांडली. हे प्रकरण बंद करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी कोर्टात केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर अक्षय शिंदे प्रकरणाची सुनावली झाली. त्यांच्यासमोर अक्षयच्या पालकांनी आपली मागणी मांडली असून कोर्टानेही त्याची दखल घेतली आहे. ही मागणी करताना तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का, अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली.
अक्षयच्या पालकांनी आपल्यावर कुणाचाही दबाव नसल्याचे कोर्टात स्पष्ट केले. आता धावपळ सहन होत नाही. काही दिवसांपूर्वीच नातवाचा जन्म झाला असून सून घरी एकटीच आहे, असे कारणही पालकांनी कोर्टात दिले आहे. त्यामुळे एन्काऊंटर प्रकरण आता पुढे लढायचे नाही, ते बंद करावे, अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली.
कोर्टाने आता शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे कोर्ट याबाबत काय निकाल देणार, पालकांना केस न लढण्याची परवानगी देणार का, पुढे या केसचे काय होणार, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहे. अक्षयच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने संबंधित पोलिसांवर ठपका ठेवला होता.
बदलापूरमधील एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली होती. त्याचा नंतर एन्काऊंटर झाला होता. याप्रकरणी अक्षयच्या पालकांनी हायकोर्टात धाव घेत या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.