राऊतांची कीव वाटते ; भाजपचा टोला, आता लोकशाही आठवते का?

'कर नाही त्याला डर कसली,' आता राऊतांना लोकशाही आठवायला लागलीय का?''
sanjay raut
sanjay rautsarkarnama

मुंबई : : सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu)यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. यावरुन आता राजकारण पेटलं आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

''संजय राऊत यांनी पाठवलेले पत्र पाहिल्यानंतर संजय राऊत यांची केवळ आणि केवळ कीव वाटते. कालपर्यत देशाचे पंतप्रधान आणि भाजपच्या कार्यकर्त्याना अर्वाच्य, घाणेरड्या भाषेत बोलणारे संजय राऊत आता ईडीला सामोरे जा ना. 'कर नाही त्याला डर कसली,' आता राऊतांना लोकशाही आठवायला लागलीय का?'' असा प्रश्न भातखळकरांनी राऊतांना विचारला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, ''राऊत साहेब काळजी करू नका ईडी तुमची चौकशी करेल ती कायद्यानुसार करेल. आपण तथाकथित बोगस डिग्रीच्या नावाखाली एका महिलेला 47 दिवस तुरुंगात पाठवले. किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर 'सामना'मधून त्यांच्या शारीरिक व्यंगावर हल्ला केला. तुम्हाला आता लोकशाही आठवते का?

'सत्यमेव जयते' म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu)यांना एक पत्र लिहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. 'सत्यमेव जयते' म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu)यांना एक पत्र लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा ईडीवरुन वाद पेटला आहे.

या पत्रात संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. ''सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

sanjay raut
लतादीदींवरील ट्रोलवरुन प्रकाश आंबेडकर संतप्त ; टि्वट करुन झोडपलं

सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी त्या पत्रात म्हटलं आहे.

2012-2013 मध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला अशीच छोटी जमीन विकणाऱ्या इतर लोकांसोबतही हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस ईडी आणि इतर एजन्सींचे कर्मचारी या लोकांना फोन करतात आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी देत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com