शिवसेनेची अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही: शीतल देसाईंचा पलटवार

भाजप (bjp) नेत्यांना मूळव्याध सतावतो आहे का, अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी केली होती.
Sheetal Desai- kishori pednekar
Sheetal Desai- kishori pednekar Sarkarnama

मुंबई : शहरातील कामे, त्यांचा दर्जा व भ्रष्टाचार, उद्यानांचे व पुलांचे नामकरण आदी मुद्यांवर संघर्ष झाल्यानंतर सेना-भाजपच्या महिला नेत्यांमध्येही आता वाकयुद्ध पेटले आहे. भाजप नेत्यांना मूळव्याध सतावतो आहे का, या महापौरांच्या टीकेला, सेनेची अवस्था सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशी झाल्याचे उत्तर भाजप (bjp) मुंबई महिला मोर्चा अध्यक्षांनी दिले आहे.

फक्त शोभेचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या (Shivsena) हाती असून सत्तेच्या चाव्या मात्र राष्ट्रवादीकडेच आहेत. त्यामुळे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था झालेले शिवसेनेचे काही नेते रोज भाजपला लाखोली वाहून राग काढत आहेत, अशी जळजळीत टीका मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल देसाई (Sheetal desai) यांनी केली आहे. (Shital Desai news)

Sheetal Desai- kishori pednekar
न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे ? आमच्या बारा आमदारांना का नाही!

'फक्त शोभेचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या हाती असून सत्तेच्या चाव्या मात्र राष्ट्रवादीकडेच आहेत. त्यामुळे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. त्यामुळेच शिवसेनतील काही नेते दररोज भाजपला लाखोली वाहून राग काढत आहेत. आता शिवसेनेच्या हाती फक्त रिकामा खोका आहे, सत्तेचे लोणी तर दूसरेच कोणीतरी पळवले आहे, हेच सेनानेत्यांचे खरे दुःख असल्याचा सणसणीत टोलाही शीतल देसाई यांनी लगावला आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या जागांमध्ये घटच होत गेली. दुसरीकडे जनतेत लोकप्रिय ठरल्याने भाजपच्या जागा वाढल्या. त्या जळफळाटातून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत अनैसर्गिक युती केली. शिवसेनेकडे शोभेचे मुख्यमंत्रीपद मिळाले. पण सर्व अधिकार मात्र बारामतीकरांच्या हाती गेले. महत्वाची खाती आणि आर्थिक तरतूदी सर्वात जास्त राष्ट्रवादीच्याच खात्यांना आणि आमदारांच्या वाट्याला गेल्या. त्यामुळे शिवसेना आता तोंड दाबून बुक्य्यांचा मार सहन करत आहे, अशी उपहासात्मक टीकाही श्रीमती शीतल देसाई यांनी केली.

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी वाटेल तशा कोलांट्या उड्या मारल्या, पण आता बडा घर पोकळ वासा, अशी शिवसेनेची अवस्था झाल्याचे दिसत आहे. नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा, गाढवही गेले अन ब्रह्मचर्यही गेले, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, या अशा शाळेत शिकलेल्या म्हणींचा अर्थ आता शिवसेना नेत्यांना कळू लागला आहे. पण हा धोंडा त्यांनीच आपल्या पायावर मारून घेतला आहे. त्यामुळे आता नशिबाला दोष देण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही उरले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी एकदा पुढे टाकलेले पाऊल दलदलीत खोल खोल फसत चालले आहे. त्यामुळे पुढेही जाता येत नाही आणि मागेही येता येत नाही, अशा विचित्र शिवसेनेची परिस्थिती झाली आहे, असा टोमणाही देसाई यांनी मारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com