महाआघाडी सरकार पाडण्यास मदत न केल्यास टाईट करू : भाजप नेत्यांनी धमकावल्याचा राऊतांचा गौप्यस्फोट

ठाकरे सरकारला नख लागेल, असे कोणतेही कृत्य माझ्याकडून घडणार नाही, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर पवार कुटुंबीय आणि माझे नातेवाईक आणि जवळच्या लोकांवर ईडीचे छापे पडू लागले.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

मुंबई : भाजपचे काही लोक दिल्लीत मला तीनवेळा भेटले, त्यांनी आम्हाला या सरकारमधून बाहेर पडा, असे सांगितले. आम्ही राष्ट्रपती राजवट लावू; नाहीतर काही आमदारांना फोडून आम्ही सरकार बनवू. तुम्ही त्यात तुम्ही पडू नका. तुम्ही आम्हाला मदत केली नाही तर आम्ही टाईट करू आणि फिक्स करू. त्यावर मी त्यांना काही हरकत नाही. मात्र, ठाकरे सरकारला नख लागेल, असे कोणतेही कृत्य माझ्याकडून घडणार नाही, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर पवार कुटुंबीय आणि माझे नातेवाईक आणि जवळच्या लोकांवर ईडीचे छापे पडू लागले, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केला. (BJP leaders met me in Delhi to overthrow the maha aagdhi government : Sanjay Raut)

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोविड सेंटरचे कंत्राट आणि वाईन विक्रीच्या परवानगीवरून खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करायला सुरुवात केली होती. त्यानंतर राऊत यांनी सोमवारी भाजप नेत्यांचा भांडाभोड करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज राऊत यांनी शिवसेनेचे खासदार, आमदार आणि नेत्यांसह पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला.

Sanjay Raut
वर्ध्यात मनसेला खिंडार : उपजिल्हाध्यक्षांसह ५० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

संजय राऊत यांनी जय महाराष्ट्र म्हणत पत्रकार परिषदेला सुरुवात केली. मला असं वाटतंय ही आंतराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे. शिवसेना वास्तूला ऐतिहासिक महत्व आहे. या वास्तूने अनेक हल्ले पचवले आहेत. याच वास्तूच्या खाली बॉम्बस्फोट झाले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन आले होते. त्यांनी सर्वांनी आम्हाला आगे बढो असे सांगितले आहे. त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत, असे राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येथूनच नमस्कार करतो. ते वर्षा बंगल्यावरून पत्रकार परिषद पाहत आहेत. तुम्ही पुढे जा, मराठी माणसांवर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे, त्या आक्रमणाविरुद्ध कोणीतरी रणशिंग फुंकायला हवं होते. ते ऐतिहासिक काम करायला हवं. तू काही पाप केलं नसशील तर कोणाच्या बापाला घाबरू नका, असे बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले आहे.

Sanjay Raut
भाजपला बरबाद करण्याचा इशारा देणाऱ्या राऊतांना लाडांचे चोख प्रत्युत्तर

महाराष्ट्र ही गांडूची औलाद नाही, मराठी माणूस नामर्द नाही. तुम्ही कितीही वार केले, तर आम्ही घाबरणार नाही, असा संदेश देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. शिवसेना असेल, ठाकरे परिवार असेल, आमचे आनंदराव अडसूळ असतील, रवींद्र वायकर, अनिल परब, भावना गवळी, राष्ट्रवादीचे प्रमुख, पवार कुटुंबीय यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ले सुरू आहे. हे देशावरचे संकट आहे. पश्चिम बंगालमध्येही असेच चालले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Sanjay Raut
तर धनंजय मुंडे तुरूंगात असते! करूणा शर्मांनी सांगितलं कारण..

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार त्यांना घालवायचं आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. एक तर तुम्ही सरेंडर व्हा, गुडघे टेका, अशा धमक्या सतत दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला १७० चे बहुमत असताना सरकार पडण्याच्या तारखा कशाच्या आधारावर देता? मी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र दिले. त्यापासून यास सुरवात झाली. केंद्रिय यंत्रणा माझ्यासारख्या खासदाराला कसा त्रास देत आहेत, हे मी त्यात लिहिले. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक मला भेटले. तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, असे त्यांनी मला सांगितले. एक तर आम्ही राष्ट्रवादी राजवट आणू. तुम्ही मध्ये पडू नका. तुम्ही आम्हाला मदत करा, असे या भाजप नेत्यांनी मला सांगितले.

तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा आम्हाला टाईट करतील, असा शब्द त्यांनी वापरला. तुम्हाला नंतर पश्चाताप होईल, आम्हाला मदत न केल्याचा असा इशारा भाजप नेत्यांनी दिला. मात्र ठाकरे सरकारला नख लागेल, असे कोणतेही कृत्य माझ्याकडून घडणार नाही, असे मी त्यांना सांगितले. पवार कुटुंबियांवरही छापे पडू लागले. पवार कुटुंबीयांच्या मुलींच्या घरात छापे पाडून तेथे अशाच धमक्या दिल्या गेल्या, असा गौप्यस्फोट केला.

महाराष्ट्रात सरकार पाडायचा प्रयत्न झाला तर ठिणगी पडेल, असे मी त्यांना सांगितले. मी नकार दिल्यानंतर त्याच्या तिसऱ्या दिवसापासून धाडी पडायला सुरवात झाली. त्या आधी मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेतो. तुमचे सरकार महाराष्ट्रात आले नाही म्हणून तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करता. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला गुडघे टेकायला शिकवले नाही. असे मी त्यांना सांगितले की माझ्या आजूबाजूच्या लोकांना अडकावयचा प्रयत्न केला. मराठी माणसाने धंदा करूच नये, असे यांना वाटते. मुलांना फोन करून धमकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतकं निर्घृण राजकारण झालं नसेल. पण भाजपने ते केला आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com