Politics : तीन दिवसांपैकी एक मिनीटही झोपलो नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितला बंडखोरीदरम्यानचा किस्सा

Eknath Shinde : ''सध्या कामाचा भार आहे पण तरी देखील जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न मी करतो...''
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesarkarnama

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील ४० आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. या बंडखोरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भाष्य केलं आहे.

''राज्यात सत्तांतर झाले त्यावेळी त्या तीन दिवसांपैकी एक मिनीट देखील मी झोपलो नव्हतो'', असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच ''सध्या कामाचा भार आहेच. लोकांना भेटणे, प्रशासकीय कामे आणि विभागाच्या मीटिंग असतात. पण तरी देखील जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न मी करतो. त्यामुळे झोप कमी मिळते'', असं शिंदे म्हणाले. मुंबईत आयोजित 'सकाळ' सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

CM Eknath Shinde
Chinchwad By-Election : बिनविरोधसाठी आमदार लांडगेंची विरोधी पक्षांना साद, प्रतिसाद मिळणार का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,''राज्याच्या विकासावर चर्चा झाली पाहिजे. विचारधारेने पुढे गेले पाहिजे. तसेच मागील अडीच वर्षात काय काम झालं?'', असं म्हणत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

तसेच 'पुढच्या दोन वर्षात मुंबईत एक देखील खड्डा दिसणार नाही. मुंबईमध्ये जगभरातील लोकं येतात. मुंबई फायनान्शिअल हब आहे. त्यामुळे मुंबई जशी आहे, तशी लोकांना देण्याचे काम आम्ही करतो आहोत'', असंही ते यावेळी म्हणाले.

CM Eknath Shinde
Vanchit vs Bhide Guruji : भिडे गुरुजींना विरोध करणाऱ्या 'वंचित' पदाधिकऱ्यांचा दिवस गेला पोलीस ठाण्यात

''आम्ही लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जे काम आम्ही केलं ते काम करण्याची गरज होती. मात्र, मागील अडीच वर्षात काय काम झालं? महाविकास आघाडीच्या काळात फक्त इगोमुळे मेट्रोचे काम थांबले होते. आमचं सरकार आलं आणि राज्यातील विकासाचे काम पटापट मार्गी लागले. त्यामध्ये समृद्धी महामार्गाचे काम असेल किंवा मेट्रोचे काम असेल. तसेच मुंबईतील इतर कामं असतील ही सर्व कामे जोमाने झाली'', असं ते यावेळी म्हणाले.

CM Eknath Shinde
Politics :...अन्यथा लोक म्हणतील मुख्यमंत्री बदलला; एकनाथ शिंदेंनी सांगितलं काम करण्यामागचं रहस्य

''लोकांचा गराडा त्यांची कामं हेच माझं टॉनिक आणि ऊर्जा आहे. लोकांची कामे करावी लागणार आहेत. अन्यथा मुख्यमंत्री बदलला असे लोक म्हणतील. तसेच समृद्धी महामार्ग या प्रकल्पाने सर्वांना भरभरुन दिलं आहे. या प्रकल्पादरम्यान अनेकांनी अडचणी आणल्या. मात्र, त्या पार करुन आज एक मोठा प्रकल्प उभा राहिला आहे'', असं शिंदे यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com