राज्यात महापुराचे संकट अन् मंत्रिमंडळ बैठकीत फक्त मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री!

शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी होऊन चौदा दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार नाही.
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis NewsSarkarnama

मुंबई : राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. अनेक नद्यांना महापूर आल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. पण अशास्थितीत राज्यात मंत्रिमंडळच अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेच राज्याचा गाडा हाकत आहेत. आजची मंत्रिमंडळाची बैठकही दोघांनीच घेतली. त्यामुळे आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सर्वोच्च न्यायालयात काही आमदारांच्या अपात्रतेची याचिका असल्याने हा विस्तार रखडल्याचे सांगितले जात आहे. तर येत्या 19 जुलै रोजी हा विस्तार होऊ शकतो, अशीही शक्यता आहे. न्यायालय काय निर्णय देणार, यावरही मंत्रिमंडळाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाबाबत संभ्रम निर्माण झाले आहेत.

Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
शिंदेंना 15 खासदार भेटले? राऊतांनी आकडा 'करेक्ट' केला...

दरम्यान, मंत्रिमंडळामध्ये इंधन दर कपात, राज्याची पुरस्थिती यासंह विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचे समजते. याबाबत एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषदेत माहिती देणार आहे. राज्यातील जनतेला इंधर दरात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राऊतांकडून राज्यपालांवर टीका

अजूनही विस्तार झालेला नसल्याने राज्यात लॉकडाऊनसारखी स्थिती झाल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी गुरूवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्र परत लॉकडाऊनमध्ये गेला आहे. महापूरात जवळपास शंभर लोकं मृत्यूमुखी पडली आहेत. अनेक भागात कॉलराचं थैमान आहे. तिथेही लोकं मृत्यूमुखी पडत आहेत. दवाखान्यात गोंधळ आहे. अशा स्थितीत राज्यात सरकार नाही. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं म्हणजे सरकार आलं असं होत नाही.

Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
Maharashtra News : महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनमध्ये, राज्यपाल कुठे आहेत?

बारा दिवस होऊन गेले मग सरकार का स्थापन होत नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी ठेवली आहे. यातील अनेक आमदार एका गटात गेले आहेत. ते अपात्र ठरू शकतात. अपात्रतेची टांगती तलवार असलेल्यांना शपथ देणं हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजद्रोह आणि राजकीय भ्रष्टाचार आहे, अशी टीका राऊतांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com