राज्यपाल आणणार बच्चू कडूंना अडचणीत? भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर रस्ते निधीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
Bhagat Singh Koshiyari, Bachhu Kadu
Bhagat Singh Koshiyari, Bachhu KaduSarkarnama

मुंबई : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी त्यांच्यावर रस्ते निधीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच या आरोपांची चौकशी करण्याची मागणी थेट राज्यपालांकडे केले आहेत. त्यामुळे राज्यपाल या चौकशीला परवानगी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्यमंडळाने सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांची भेट घेतली. बच्चू कडू यांनी केलेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत आम्ही न्यायालयातही गेलो आहे. न्यायालयाने कडू यांनी बनावट दस्तऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करून केलेल्या भ्रष्टाचारावर ताशेरे ओढले आहेत, याबाबतही राज्यपालांना सांगितल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.

Bhagat Singh Koshiyari, Bachhu Kadu
बुलडाण्यातील व्यापाऱ्याचा केंद्र सरकारच्या तिजोरीवर शंभर कोटींचा डल्ला

राज्यपालांनी याप्रकरणी योग्य त्या सुचना देणार असल्याचे आश्वासन दिल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. बच्चु कडु यांना डिपीडीसी बाबत वारंवार सांगुन ते ऐकत नाहीत. डिपीडीसी नवी कामे घेऊन त्याला मान्यता देऊ शकत नाही. बच्चु कडू यांनी अनेक कामे मंजुर करुन निधी वापरलेला आहे. यामुळे न्यायालयात जाऊन शासनाच्या पैशाची चोरी झाली आहे, असे आम्ही सांगितले आहे. आज राज्यपालांना भेटुन याची ९० दिवसांत चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीने ठरवून दिलेल्या रस्त्यांच्या कामात फेरफार करत भ्रष्टाचार केल्याचा कडू यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्यावरही आरोप केले गेले आहेत. शासनमान्य क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामांची यादी कडू यांनी जिल्हा परिषदेला पाठवली. यासंदर्भातील पुरावे आणि माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रशासनाला दिली.

पुंडकर यांनी याबाबत तक्रार करण्यासाठी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनाही निवेदन दिले. अखेर कलम 156/3 अंतर्गत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com