Rahul Gandhi : राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा सुरु होण्यापूर्वीच रद्द! BKC मैदानावरील सभेला पोलिसांचा विरोध, नेमका आक्षेप काय?

Rahul Gandhi's visit to Mumbai is cancelled : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 20 ऑगस्ट रोजी बीकेसी मध्ये होणाऱ्या त्यांच्या सभेवर मुंबई वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhisarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 17 August : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा महाराष्ट्र दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 20 ऑगस्ट रोजी बीकेसी मध्ये होणाऱ्या त्यांच्या सभेवर मुंबई वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला होता. अशातच आता हा दौराच रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील आगामी विधानसभेसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभांचे आयोजन करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विश्वास वाढवण्याचं काम सध्या केलं जात आहे. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत राज्यात काँग्रेसला प्रचंड यश मिळालं आहे.

विधानसभेलाही लोकसभेप्रमाणे कामगिरी करण्यासाठी काँग्रेस (Congress) कामाला लागली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. त्यांची मुंबईतील बीकेसी येथे 20 ऑगस्ट रोजी सभा होणार होती. मात्र, या सभेवर मुंबई वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला. पोलिसांच्या या भूमिकेचा काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे.

Rahul Gandhi
Haryana Politics : हरियाणात विधानसभा निवडणुकीआधीच 'या' प्रमुख पक्षाला धक्के; दोनच दिवसांत चार आमदारांचे राजीनामे!

अशातच आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 20 ऑगस्ट रोजी राहुल हे महाराष्ट्रात येणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तर या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्येंना षण्मुखानंद सभागृहात मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण राहुल यांचा दौरा रद्द झाल्यामुळे आता राज्यातील काँग्रेस नेते आणि पदाधिकारी नाराज झाले आहेत.

Rahul Gandhi
Congress News :... तर विधानसभा निवडणूक लावण्याचे धाडस का करत नाही? राज्य सरकारला सचिन सावंतांचा सवाल

पोलिसांचा नेमका आक्षेप काय?

बीकेसीमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार असल्याचं सांगण्यात आलं होत. मात्र, सध्या सायन रेल्वे स्टेशन रोडवरील ब्रिज बंद आहे. नवीन पूलाचे काम सुरू करण्यासाठी जुना पूल पाडण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतूक 'बीकेसी'तून जात आहे. आधीच बीकेसीत प्रचंड वाहतूक कोंडी असते. अशातच या ठिकाणी राहुल गांधींची सभा झाली तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ शकते. या कारणामुळे पोलिसांनी या सभेवर आक्षेप घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com