Mahayuti: बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीची खेळी; निवडणुकीपूर्वीच 'त्या' 12 आमदारांची नियुक्ती होणार

Governor Appointed 12 MLA Seats who will get mla before assembly election: साडेचार वर्षांपासून 12 आमदारांच्या नेमणुकीवरून जोरदार राजकारण सुरु आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच 12 आमदारांची नियुक्त होणार असल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवडीची प्रक्रिया सुरु झाली होती. पण या 12 आमदारांच्या नियुक्तीचे घोंगडे भिजत पडले आहे. आता महायुती सरकार काळात शेवटच्या टप्प्यात त्याल मुहूर्त मिळण्याचे चित्र आहे. आता राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

विधानसभेच्या तोंडावर बंडखोरी टाळण्यासाठी या 12 आमदारांची नियुक्ती लवकर होणार आहे. महायुती त्यासाठी कामाला लागली आहे. महायुतीत जागावाटपात कठीण असणाऱ्या १२ जागांची बंडखोरी रोखण्यासाठी या आमदारांची नेमणुकीचा रामबाण उपाय महायुतीने शोधला आहे.

गेल्या साडेचार वर्षांपासून 12 आमदारांच्या नेमणुकीवरून जोरदार राजकारण सुरु आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच 12 आमदारांची नियुक्त होणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वीच महायुतीकडून यावर निर्णय होणार आहे.राज्यात जुलै 2022 मध्ये सत्ता परिवर्तन झाले. महायुतीचे सरकार आले. आधीच्या आमदारांची यादी बारगळली. आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा मुद्दा धसास लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Manoj Jarange Patil: शरद पवार यांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका; जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

या 12 आमदारांची नियुक्ती करताना मर्जीतील कार्यकर्ता, पदाधिकारी, सामाजिक, जातीय समि‍करणांचा विचार होणार आहे. काहींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. विधानसभेच्या तोंडावरच 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुहूर्त साधल्या जात असल्याने विरोधकांना आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Sharad Pawar: CM पदावरुन शरद पवार यांनी MVAच्या नेत्यांचे टोचले कान

गेल्या चार वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 जागांचा मुद्दा रखडला आहे. महाविकास आघाडी सरकारने जून 2020 मध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्याला काही हिरवा कंदिल दाखवला नाही.

कोश्यारी यांनी मुद्दामहून अडवणूक केल्याचा आरोप करीत कोल्हापूर येथील सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 12 जागापैकी भाजपने 6 जागांवर दावा केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 3-3 जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com