मनसेच्या हनुमान चालिसा पठणात हिंदू संघटनाची माघार : विहिंप

MNS| Raj Thackeray| Vishwa Hindu Parishad| भोंगे न उतरल्यास चार तारखेला देशभरात मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
Vishwa Hindu Parishad|
Vishwa Hindu Parishad|

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी भोंग्यासंदर्भात राज्य सरकारला पुन्हा इशारा दिला. औरंगाबादमध्ये रविवारी केलेल्या भाषणात त्यांनी चार तारखेला देशभरात मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केलं आहे. मात्र राज ठाकरे यांच्या या आवाहनानंतर विश्व हिंदू परिषदेने प्रतिक्रिया दिली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेच्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद सहभागी होणार नाही, असं राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटलं आहे.

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल मनसेच्या हनुमान चालीसा कार्यक्रमाला पाठिंबा देणार नाही. राज ठाकरे दुष्प्रचाराचं राजकारण करत आहेत. पण विश्व हिंदू परिषद ही कोणतीही राजकीय संघटना नसून कुठल्याही पक्षाशी संघटनेचा संबंध नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या हनुमान चालीसा कार्यक्रमाच्या भूमिकेशी विंहिंप सहमत नाही. त्यामुळे विहिंप मनसेच्या हनुमान चालीसाच्या कार्यक्रमात सहभागी न होणार नाही.

Vishwa Hindu Parishad|
तेव्हा शिवसेना कुठे होती हे सुंदर सिंह भंडारींना विचारा : राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

गुडीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी पसरली. ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले. औरंगाबादच्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत सरकारला भोंगे हटवण्यास सांगितले. राज ठाकरेंच्या या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेचं सर्व हिंदु संघटना पाठिंबा देतील, असं मानलं जात होते.

दरम्यान, राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटकसह इतर राज्यांत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी हिंदु संघटनां पुढे सरसावल्या. देशभरात ठिक ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलिसांना निवेदन देण्यात आली. उत्तर प्रदेशातील योगी सरकारनेही राज्यातील ११ हजार भोंग्यांवर कारवाई केली. राज ठाकरेंनीही योगी सरकारच्या या निर्णयाचं कौतुक केलं. तर, उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जावू शकतात तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर ४ मे रोजी देशातील हिंदु बांधवांनी पोलीस परवानगी घेऊन मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावावी, असं आवाहन केलं होते. त्यानंतर आता विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलसारख्या हिंदु संघटनांनी माघार घेतला असेल तर राज ठाकरेंच्या आवाहनाला राज्याबाहेर किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणं गरजेचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com