शिंदेंनी भाजपसोबत जाण्याचा विषय काढताच ठाकरेंचेही रक्त उसळले होते...

Uddhav Thackeray | Eknath Shinde : नेतृत्व भेटत नाही, वेळ देत नसल्याची आमदारांची खदखद
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करणाऱ्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेच्या (Shivsena) आता ३८ आमदारांचे संख्याबळ झाले आहे. अपक्षांना धरुन हा आकडा ४६ पर्यंत जातो. पहिल्या दिवशी त्यांच्यासोबत केवळ १८ आमदार होते, मात्र हळू हळू हा आकडा वाढत आहे. या ४६ आमदारांमध्ये तब्बल ६ मंत्र्यांचा देखील समावेश आहे. यातील प्रत्येक आमदाराने थेट पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेची साथ सोडून भाजपसोबत जावे अशी मागणी केली आहे. (Eknath Shinde latest news)

मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंत्री आणि आमदार फुटून जाण्यापूर्वी या बंडाची कल्पना मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुख म्हणून देखील उद्धव ठाकरे यांना कशी आली नाही? एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे, खदखद आहे, ही गोष्ट ठाकरे यांच्या लक्षात कशी आली नाही? असा सवाल विचारला जात आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत आपण एकनाथ शिंदे यांना बोलावून बंडाचे आपल्या कानावर आले असल्याचे विचारले असल्याचा गौप्यस्फोट केला. (Shivsena Political Party Latest News)

उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्यात नेमका काय संवाद झाला होता?

उद्धव ठाकरे म्हणाले, एकदा बंडाची गोष्ट कानावर आल्यावर मी त्यांना बोलवून विचारलं होतं. "हे बंडाचं माझ्या कानावर आहे, खरं आहे का?" त्यावर "नाही नाही आपण असे कसे वागू", असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी आजच्या संभाषणात सांगितले. त्यावर "खोटं असेल आणि खोटं असावं, हेच आपलं म्हणणं" असल्याचं उद्धव यांनी सांगितलं होतं. खोटं असेल तर मुद्दा नाही, पण खरं असेल तर स्पष्ट सांगा असेही म्हणाल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. (Maharashtra Political Crises)

त्यावर पुन्हा खुलासा करत शिंदे यांनी ठाकरे यांना मनातील गोष्ट बोलून दाखविली होती. "आपण भाजपासोबत जायला हवं, असा काही आमदारांचा आपल्यावर दबाव आहे", असे एकनाथ शिंदे म्हणाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यावर शिंदे यांनी भाजपचा विषय काढता ठाकरे यांचेही रक्त उसळले होते आणि त्यांनी शिंदे यांनाही तोच प्रश्न केला की "ठीक आहे, आपण जनतेसमोर जाऊ, भाजपासोबत परत जायला, मात्र भाजपाने आपल्यावर आणि मातोश्रीवर आरोप केले, ते ऐकल्यानंतर तुमचं रक्त नाही उसळलत का", असा सवाल एकनाथ शिंदे यांना केला होता, असेही ठाकरे म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com