भाषण न करता राज्यपाल निघून गेले ; 'शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणले

राज्यपाल कोश्यारी उभे राहिले. त्याचे भाषण सुरु होण्यापूर्वी सभागृहात घोषणाबाजी झाली. त्यामुळे त्यांनी आपले भाषण अर्धवट सोडून ते तातडीने निघून गेले.
Bhagat Singh Koshyari controversial statements |Maharashtra assembly budget 2022
Bhagat Singh Koshyari controversial statements |Maharashtra assembly budget 2022sarkarnama

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीन दिवसापूर्वी वादग्रस्त विधान केले होते. त्यांचा निषेध आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आला. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाला. कोश्यारी यांनी आपले भाषण थांबवले. काही मिनिटांतच कोश्यारी सभागृहातून निघून गेले.

राज्याच्या अर्थसंकल्पीय (Maharashtra assembly budget 2022) अधिवेशनाला आजपासून (गुरूवार) सुरूवात होत आहे. यावेळी अभिभाषण करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी उभे राहिले. त्याचे भाषण सुरु होण्यापूर्वी सभागृहात घोषणाबाजी झाली. आपले भाषण अर्धवट सोडून ते तातडीने निघून गेले. (Bhagat Singh Koshyari controversial statements News)

''चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात रविवारी केले. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याविषयी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

Bhagat Singh Koshyari controversial statements |Maharashtra assembly budget 2022
मला चंद्रकांतदादांची कीव येते ; संजय राऊतांचा टोला

यंदाचे अधिवेशन हे ठाकरे सरकारच्या काळातील सर्वाधिक कालावधीचे असे आहे. यंदा ३ मार्च ते २४ मार्च या कालावधीत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे.

''विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरेल अशी हूल विरोधी पक्षातर्फे उठवली जाते आहे. आदड आपट करून वादळी अधिवेशन होत नाही. त्यामुळे कसलं वादळ निर्माण करणारे कुठेतरी फुंकर मारता त्यांना वाटत वादळ आले अशी वादळ येत नाही,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, ''वादळ अडीच वर्षांपूर्वी आले त्यांच्यामुळे सगळे झोपले ते अजून उठले नाहीत. विरोधकांनी प्रश्न विचारावे आपण संसदीय लोकशाही मानतो दिल्लीतील राज्यसभेत संसदीय लोकशाहीला किंमत नसेल महाराष्ट्रातील विधानसभेला मोठी परंपरा आहे त्यानुसार विरोधी पक्षाने काम करावे. राज्यातील मुख्यमंत्री हे राजकीय सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेताय भविष्यात ते महाराष्ट्रभर फिरतील महाविकास आघाडी भक्कम करतील,''

कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचे ठिकठिकाणी पडसाद उमटताना दिसून येत आहेत. सोलापुरात ४ मार्चला राज्यपालांचा दौरा आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शिवभक्तांनी राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कोश्यारींनी माफी मागावी, अन्यथा त्यांचा दौरा रोखणार असल्याचा इशारा येथील शिवभक्तांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com