Mumbai News: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (ता. 3)सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाणार आहे. अधिवेशन काळात काही प्रमुख मुद्दे ऐरणीवर आले आहेत.
अधिवेशनात विरोधकांनी धारेवर धरण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सज्ज झाले आहेत. अधिवेशनात चार मुद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना सळो की पळो सोडणार, असे सध्याचे चित्र आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या करणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडला झालेली अटक, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पाच लाखांहून अधिक महिला अपात्र, स्वारगेट एसटी स्थानक बलात्कार प्रकरण, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात सुनावण्यात आलेली शिक्षा आदी प्रमुख मुद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घाम फोडणार आहेत.
महायुतीत धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोघांचा राजीनामा घेण्यावरुन विरोधक सभागृहात गोंधळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंडे-कोकाटे यांच्या राजीनाम्यावर ठाम असलेल्या विरोधकांना महायुतीतील शिलेदार कसे सामोरे जातात, हे उद्या समजेल. राज्यातील महत्वाच्या प्रश्नावरुन संख्येने कमी असलेले विरोधक बलाढ्य सत्ताधाऱ्यांपुढे कसे लढतात, हे पाहणे औत्सुकाचे ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.