Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीला कॅबिनेटसह चार राज्यमंत्रिपदं; मग नाराज शिवसेनेला किती ?

Monsoon Session And Cabinet Expansion : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Cabinet Expansion And NCP : राज्य सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट सहभागी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेले शिवसेनेतील आमदार नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता लवकरच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच केले आहे. (Latest Political News)

दुसऱ्या मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळेल, अशी आशा शिवसेनेतील आमदारांना होती. मात्र यावेळी सर्वच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शपथ घेतली. आता होणाऱ्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसला समसमान मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला एक कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे. (प्रफुल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे यापूर्वीच चर्चा होती.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Maharashtra Cabinet Expansion : 'वर्षा'वर मध्यरात्रीपर्यंत गुप्त बैठक; अजितदादा एक तास उशीरा आले अन् लवकर..

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्री असण्याची शक्यता आहे. राज्यात आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांसह एकूण २९ मंत्री आहेत. आता आणखी १४ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी आधीच ठरल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी चार मंत्रीपदे मिळणार आहेत. यामध्ये एक कॅबिनेट तर इतर तीन राज्यमंत्री असतील, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. आता राष्ट्रवादीला १४ पैकी चार मंत्रिपदे मिळाली तर भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी पाच मंत्रिपदे मिळतील.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Pimpri-Chinchwad News : राज्यातील राजकारणावर पिंपरी-चिंचवडकारांनी 'असा' व्यक्त केला संताप !

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील आठ जणांनी २ जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. यास आता आठवडा उलटून गेला असला तरी या सर्व मंत्र्यांना अद्यापही खाती मिळालेली नाहीत. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित मंत्र्यांना लवकरच खातेवाटप केले जाणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, १७ जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता लवकरच खातेवाटपासह तिसरे मंत्रिमंडळ विस्तार होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com