अजितदादा तीनच वर्षात राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनवर पोचवणार; अशी केलीय तयारी

राज्याच्या विकासासाठी पंचसूत्री निश्चित केल्याचे सांगत त्यानुसार अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची पहिली घोषणा त्यांनी केली. त्यांनी राज्याच्या विकासासाठी पंचसूत्री निश्चित केल्याचे सांगत त्यानुसार अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra Budget)

अजित पवार हे आज महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आरोग्य, दळणवळण, कृषी, उद्योग आणि मनुष्यबळ विकास हाच यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण असल्याचे सांगत अजित त्यांनी त्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, भारतीय तत्वज्ञानातील पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश पंचतत्वांप्रमाणेच विकासात अंतर्भूत असलेली आवश्यक असलेली पंचसुत्रीही आपण अंगीकारली पाहिजे. (Maharashtra Budget 2022)

Ajit Pawar
अजित पवारांनी पहिलीच मोठी घोषणा केली अन् सभागृहात संभाजी महाराजांचा जयघोष!

आरोग्य, दळणवळण, कृषी, उद्योग, मनुष्यबळ विकास या पाच सुत्रांनी झालेला विकास म्हणजेच विकास असतो. ही पंचसुत्रीच म्हणजे आपल्या यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण आहे. विकासाची पंचसुत्री हा विशेष कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी तीन वर्षात चार लाख कोटी उपलब्ध करून दिली जाईल. त्यातून राज्याच्या अर्थव्यवस्थेत भरीव गुंतवणूक होईल आणि महाराष्ट्र हे देशातील एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य ठरेल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं.

संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी

वढू बुद्रुक व तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj) स्मारक उभारण्याची घोषणा पवारांनी केली. त्यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पवार म्हणाले, आज 11 मार्च. महाराष्ट्राची अस्मिता, स्फुर्तीस्थान, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आज स्मृतिदिन. या दिनाचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकतृत्वाला साजेसे असे त्यांचे स्मारक वढू बुद्रुक व तुळापूर ता. हवेली या परिसरात उभारण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यासाठी शासनाकडून 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

Ajit Pawar
State Budget: कृषीविद्यापीठ, महिला शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद

संभाजी महारजांच्या नावाने शौर्य पुरस्कार

असामान्य शौर्य धाडस दाखवणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी येत्या वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली. त्यानंतर महाराजांच्या स्फुर्तीदायी स्मृतींना अभिवादन करून तिसरा अर्थसंकल्प सादर करतो, असं म्हणत अजितदादांनी सुरूवात सुरूवात केली.

पीक कर्ज वाटपात वाढ करणार

''पीक कर्ज वाटपात वाढ करण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांना नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. येत्या २ वर्षात १०४ सिंचन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कोकण, परभणी कृषी विद्यापीठाला ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाला १३ हजार कोटी २५२ रुपये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. तर ६० हजार कृषी पंपाना वीज देणार येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

शासकीय ट्रॉमा सेंटर उभारणार

मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला १० कोटी रुपयांचा निधी उपलद्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक महसूल विभागात एक शेळी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. नांदेड, अमरावती, भंडारा, जालना, अहमदनगर आणि सातारा याठिकाणी प्रत्येकी ५० खाटांचे प्रथम दर्जाचे शासकीय ट्रॉमा सेंटर उभे करण्यात येणार आहेत, असे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com