Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली हस्ते खरीप हंगाम नियोजन बैठक बुधवारी (ता.21) पार पडली.या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री गिरीश महाजन आणि कृषी विभागासह हवामान खातं,रेल्वे विभाग आणि केंद्र सरकारचेही अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य सरकारकडून शेतकर्यांसाठी तयार केलेल्या अधिकृत केलेल्या महाविस्तार अॅपचे उद्घाट्न करण्यात आले.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारनं अवकाळी पावसाच्या तडाख्यासह शेतीसंबंधीच्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक तालुक्यात राज्य सरकारकडून शेतीसंबंधी डिजिटल शाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
फडणवीस म्हणाले,राज्य सरकारच्या'महाविस्तार अॅप'वर शेतकर्यांना शेतीसंबंधीची सर्व माहिती मिळणार आहे. आवश्यक तेवछा खतं-बियाणांचा पुरवठा करण्यात येणार आहे.तसेच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत हवामान खात्यानं त्यांचं सादरीकरण केले.यावेळी त्यांनी विविध विभागात सरासरीपेक्षा सात ते सतरा टक्क्यांपर्यंत पाऊस असणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसेच विभागानुसार पिकांनुसार आवश्यक तेवढा खतांचा पुरवठा आहे,बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे खत किंवा बियाणांचा पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येईल.शेतकर्यांना कुठल्याही खत किंवा बियाण्यांचा तुटवडा पडणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
तसेच वारंवार बोगस बियाणांचे प्रकार बाहेर येतात, म्हणून महाराष्ट्रानं पहिल्यांदा एक अभिनव प्रयोग केला असल्यांचंही फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारच्या साथी पोर्टलवर प्रत्येक खत किंवा बियाणांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यामुळे त्या बियाणं नेमकं उत्पादन कुठं झालं आहे,याबाबतचा ट्रेस करता येतं अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी दिली.
पण दुर्दैवानं राज्यात जे बियाणं विकलं जातं, त्यापैकी 75 टक्के बियाणं हे ट्रूथफूल बियाणं आहे. जे बियाणं उत्पादकानं स्वत:तयार केलेलं नसतं. यातूनच बोगस बियाणांचा प्रकार समोर येतो. त्याचमुळे राज्य सरकारनं यावर्षी केंद्र सरकारला विनंती करुन हे ट्रूथफूल बियाणंही साथी पोर्टलवर आणलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ज्या खत कंपन्या सक्ती करत असतील तर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेकदा शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करताना बँकांकडून सिबील स्कोअर तपासला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही, पैसे नसल्यानं ऐन पेरणीच्या हंगामामध्ये शेतकरी अडचणीत सापडतो. याविषयी आता सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबील स्कोअरची मागणी होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच शेतकऱ्यांकडे सिबील स्कोअर मागणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी बँकाना दिला.
तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी हवामान खात्याबाबतची मोठी अपडेटही दिली आहे. ते म्हणाले, पावसाचा तसेच हवामानाचा आमचा दीर्घकालीन अंदाज बरोबर येतो. परंतू कधी कधी कमीवेळा हवामानाच्या अंदाजामध्ये बदलही होऊ शकतो, असं हवामान विभागानं सांगितल्याचं फडणवीस म्हणाले.पण एकूणच राज्यात यावेळी योग्य पाऊस पडेल, अशी अपेक्षाही फडणवीसांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.