Samajwadi Party : महाराष्ट्रातील तिसरा पक्ष फुटणार? आमदार आमने-सामने; वादाचे कारण नेमके काय आहे?

महाराष्ट्रातील समाजवादी पक्षात अबू आझमी आणि रईस शेख यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसशी वाढलेली जवळीक कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय ठरत असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे.
Growing rift between Abu Azmi and Rais Shaikh threatens Maharashtra Samajwadi Party’s unity amid speculation over Congress connections.
Growing rift between Abu Azmi and Rais Shaikh threatens Maharashtra Samajwadi Party’s unity amid speculation over Congress connections.Sarkarnama
Published on
Updated on

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनंतर महाराष्ट्रात आता तिसरा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे. 'समाजवादी' पक्षातील अंतर्गत वाद टोकाला गेला आहे. मागील काही दिवसांपासून आमदार अबू आझमी आणि आमदार रईस शेख यांच्यातील दरी वाढली आहे. दोघांमधील संबंध कमालीचे ताणले गेल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. अशात रईस शेख यांची काँग्रेस नेत्यांशी वाढलेली जवळीकही कार्यकर्त्यांसाठी चिंतादायक आहे.

महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि प्रमुख चेहरा म्हणून आमदार अबू असीम आझमी यांची ओळख आहे. तर आमदार रईस शेख हे पक्षातील आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या अबू आझमी यांच्या वाढदिवस कार्यक्रमात हा तणाव स्पष्टपणे दिसून आला. मदनपुरा येथील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासोबतच वाढदिवस सोहळ्याला रईस शेख गैरहजर राहिले.

या कार्यक्रमावेळी रईस शेख दुबईला असल्याचे सांगण्यात आले; पण कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच रईस शेख यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन 'या कार्यक्रमाला उपस्थित राहू नका' असा सूचक संदेश दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, दोघांमधील अंतर्गत नाराजीविषयी बोलताना अबू आझमी यांनी ते नाराज असून नाराजी दूर करू असे आश्वासित केले आहे.

Growing rift between Abu Azmi and Rais Shaikh threatens Maharashtra Samajwadi Party’s unity amid speculation over Congress connections.
Rahul Gandhi: पुण्यातील एका वकिलामुळे राहुल गांधी पडले तोंडघशी! विरोधकांना मिळाले आयते कोलित; कोर्टात काय घडलं?

वादाचे कारण काय आहे?

या दोन्ही आमदारांमधील तणावाचे एक कारण म्हणजे वार्ड क्रमांक 211 म्हणजेच नागपाडा परिसर. 2017 मध्ये या वॉर्डमधून रईस शेख यांनी निवडणूक जिंकली होती. त्यामुळे हा परिसर आपल्याच प्रभावक्षेत्रात राहावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. या ठिकाणी तिकीटवाटप त्यांच्या संमतीशिवाय होऊ नये, असा त्यांचा आग्रह आहे.

पण आझमी यांचे मत वेगळे असल्याचे दिसते. तिकीटवाटप हा पक्ष समितीचा अधिकार असून त्यात कोणीही वैयक्तिक हस्तक्षेप करू नये, याच भूमिकेवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे समजते. रईस शेख हे पक्षाचे अभ्यासू आमदार आहेत; मात्र ते आतापर्यंत जिथून जिंकून आले आहेत, तेथील सर्व उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्यांना हवा आहे. कुठल्याही पक्षात असे चालत नाही, असे आझमी यांनी ठणकावून सांगितले आहे.

Growing rift between Abu Azmi and Rais Shaikh threatens Maharashtra Samajwadi Party’s unity amid speculation over Congress connections.
PM Narendra Modi Speech : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे, महात्मा फुले ते मिशन सुदर्शन चक्र

वाढती जवळीक चर्चेत :

राजकीय वर्तुळात रईस शेख यांची काँग्रेस आमदार अमीन पटेल आणि अस्लम शेख यांच्याशी वाढती जवळीक चर्चेचा मुद्दा बनली आहे. म्हणजे रईस शेख अनेकदा काँग्रेस नेत्यांच्या सहवासात दिसतात. यावर अबू आझमी यांनी अमीन पटेल आणि अस्लम शेख यांना काँग्रेस पक्षातच डावलले जात आहे, उलट त्यांनीच आमच्या पक्षात यावे, असे म्हणत त्यांनाच ऑफर दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com