Arvind Sawant On Manipur : मणिपूर दोन तुकडे होण्याच्या मार्गावर; अरविंद सावंतांचा भाजपच्या भूमिकेवर संशय

Uddhav Thackeray Vs Narendra Modi : मणिपूर जळत असताना मोदी देश-विदेशाचे दौरे करतात
Arvind Sawant, Manipur Violence
Arvind Sawant, Manipur ViolenceSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या सामाजिक, आर्थिक, राजकिय पेचातून कुकी आणि मैतई समाजात तीन महिन्यांपूर्वी निर्माण झालेला तेढ अद्यापही केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजप सरकारला सोडवता आलेला नाही. याचे गंभीर परिणाम मणिपूरमध्ये दिसत असून राज्याचे दोन तुकडे होण्याची शक्यता आहे. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी देश-विदेशात जाण्यात मश्गूल आहेत, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. (Latest Political News)

विरोधकांच्या आघाडी असलेल्या 'इंडिया'तील २० खासदारांनी धुमसणाऱ्या मणिपूरला दोन दिवसांपूर्वी भेट दिली. यात सावंतही सहभागी झाले होते. 'सरकारनामा'शी बोलताना सावंत यांनी पेटणाऱ्या मणिपूरमधील विदारक परिस्थितीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर वांशिक वादातून सुरू झालेल्या हिंसाचारामुळे मणिपूरचे दोन तुकडे होण्याची भीती व्यक्त केली. या संपूर्ण दौऱ्यात आम्हाला संरक्षण असले तरी राज्यातील चित्र चिंताजनक असून याकडे केंद्र आणि मणिपूरमधील असलेले भाजप सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही सावंत यांनी केला.

Arvind Sawant, Manipur Violence
Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांसमोर जाताच अजितदादांनी आपली वाट बदलली; मोदींच्या व्यासपीठावर नेमकं काय झालं ?

'इंडिया'मधील पक्षांतील खासदारांच्या शिष्टमंडळाने मणिपूरमधील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहाणी केली. यानंतर त्यांनी रविवारी राज्यपाल अनसुईया उईके यांना एक तपशीलवार निवेदन सादर केले. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना येथील गंभीर परिस्थितीची माहिती द्या, लक्ष घालायला सांगा असे आवाहान केले. मणिपूरचा प्रश्न लवकर सोडवला नाही तर देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, याकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले.

Arvind Sawant, Manipur Violence
Shirur Election : ‘पोपटराव साहेबांचे, तर बाबूराव (दादांचे) माझे उमेदवार, असा त्या निवडणुकीत प्रचार झाला’; अजितदादांनी सांगितला किस्सा

दोन समाजातील टोकाच्या वादामुळे महिला, बालकांचे हाल सुरू असल्याचे सावंतांनी आवर्जुन नमूद केले. अरविंद सावंत म्हणाले, "मणिपूरमधील कुकी आणि मतैई अशा दोन्ही समजांच्या 'रिलीफ कॅम्प'मधील लोकांच्या भेटी घेतल्या. तेथील परिस्थिती अतिशय वाईट आहे. राज्यात सीमा उभी राहिली आहे. छोटी ठिणगी पडली त्याचवेळी योग्य पावले उचलली असती तर आज मणिपूर पेटले नसते. लोकांना आप्तेष्टांचे मृतदेह देखील मिळाले नाहीत. माता मुलाचा मृतदेह पाहण्यासाठी तरसतायात. गेलेल्या मुलाचा मृतदेही देखील तिला पाहता येत नाही. आपले एक राज्य धुमसतेय आणि माननीय पंतप्रधान फिरत आहेत."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com