Manoj Jarange Patil News : सरकारमुळेच आमचे बळी पडायला लागले; मुंबईतील आत्महत्येच्या घटनेनंतर जरांगे पाटलांचा आरोप

Manoj Jarange Patil On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जालन्यातील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मुंबईत एका ४५ वयाच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. सुनील कावळे असं त्याचं नाव आहे. कावळे हे जालन्यातील अंबडचे रहिवासी होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी तीन पानांचे पत्रही लिहिले आहे. या घटनेनंतर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण समाजाला संयम राखण्याचं आवाहन केलं आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Rally in Pune : जरांगेंच्या सभेसाठी सोयाबीन काढलं; १०० एकर जमीन ५० जेसीबीने केली सपाट

सरकारमुळे आमचे बळी पडायला लागले आहेत. आपल्याला आरक्षण मिळणार आहे. घेतल्याशिवाय सोडणार नाही. खूप वर्षे धीर धरला आहे. आणखी थोडे दिवस दम धरा. मुलंच कमी व्हायला लागले, बळी जायला लागले, आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? तुम्ही दम धरा, आरक्षण मिळेल, आपण सोडणार नाही, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे सगळं पाप सरकारचं आहे. आमचे किती आणखी मुडदे पाडायचे हे माहीत नाही. ज्या आमच्या माणसाने आत्महत्या केली, त्याला जबाबदार हे सरकार आहे. सरकारने आतातरी त्या भावांचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा निर्णय आता घ्यावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

२४ तारखेनंतर होणारं शांततेलं आंदोलन सरकारला परवडणारं नाही. आणि आम्ही हे बलिदान आता वाया जाऊ देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. आत्महत्येबाबत आपल्याला आताच कळलं. त्या कुटुंबाशी मी बोलणार आहे. परंतु, मी पुन्हा सांगतो, भावांनो आपला बळी देऊ नका. हे सरकारचं पाप आहे. हा गेलेला बळी याची गाभीर्याने दखल घेऊन सरकारने आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा. आमच्या भावाचं स्वप्न पूर्ण करा, आमचे मुडदे पडू देऊ नका, असं जरांगे पाटील म्हणाले.

या सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये. कारण झालेली आंदोलनं आणि बळी आम्ही वाया जाऊ देणार नाही. आता २४ तारखेनंतर सरकारला सुटी नाही, पण मराठा समाजाला आवाहन आहे. थोडा धीर धरा. पाया पडून सांगतो कोणी आत्महत्या करू नका, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. मुंबईतून गेल्यावर पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे. आम्हाला दुःख असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Vs Bhujbal : मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांना डिवचलं; म्हणाले, " धमकी द्यायला काय ते...?"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com