Maratha Reservation: 17 डिसेंबरपूर्वी सरकारने सांगावं, अन्यथा...; जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. जरांगे पाटीलांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे. तर या मागणीला ओबीसी बांधव विरोध करताना दिसून येत आहेत.

यावरूनच मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला असून 24 तारखेला सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढचं आंदोलन शांततेत करणार आहोत. या पुढच्या आंदोलनाची दिशा 17 तारखेला ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil
Haribhau Bagade News : ...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही; हरिभाऊ बागडेंचा गौप्यस्फोट!

तसेच सरकारने आरक्षणासंदर्भात आतापर्यंत काय पावलं उचलले ते 17 तारखेपूर्वी सांगावं, अन्यथा आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहोत, त्यानंतर सरकारचा आणि आमचा विषय संपला. सरकारने अद्याप मराठा आरक्षणाबाबत काही सांगितले नाही. त्यामुळे मराठ्यांची फसवणूक करताय की काय, अशी भावना निर्माण होत आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. ते शुक्रवारी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला.

"आमची सरकारला विनंती आहे, जे आपलं ठरलं होतं, त्यानुसार आम्हाला सांगावं, लेखी आश्वासनानुसार काय कारवाई केली, जेवढे मंत्री उपोषणस्थळी आले होते, त्यांनी या आंदोलनाची जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगावं, अन्यथा आम्ही 17 तारखेच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला तर तुमचा आणि आमचा विषय संपला", असा थेट इशारा जरांगेंनी राज्य सरकारला दिला.

"सत्तेत असणाऱ्या तिन्ही पक्षांचे नेते आमच्याकडे आले होते. मात्र, त्यांचा नंतर काही संपर्क नाही. सरकार आरक्षणाबात काय कार्यवाही करत आहे, याबाबत आम्हाला माहिती नाही. उपोषण सोडण्यासाठी सरकारचे काही प्रतिनिधी आले होते, त्यावेळी त्यांनी आम्हाला लेखी आश्वासनं दिली होती, हे आम्ही आता जाहीर करणार आहोत", असंही जरांगे पाटील म्हणाले.

यावेळी भुजबळांवरही जरांगे पाटलांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "भुजबळ यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याविरोधात रोष निर्माण होत असून त्यांनी भूमिका स्पष्ट करावी", असा निशाणा त्यांनी साधला.

(Edited by- Ganesh Thombare)

Manoj Jarange Patil
Ajit Pawar News : अजित पवारांचा दिल्ली दौरा रद्द ; काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com