Avinash Jadhav : राज ठाकरेंचे विश्वासू नेते अविनाश जाधव यांचा राजीनामा; म्हणाले, माफी असावी साहेब!

MNS Raj Thackeray Thane Assembly Election : अविनाश जाधव यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
Raj Thackeray, Avinash Jadhav
Raj Thackeray, Avinash JadhavSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. मागील निवडणुकीत विजयी झालेली एकमेव राजू पाटील यांनाही यावेळली पराभवाचा धक्का बसला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा झटका आहे. त्यातच आता त्यांचे विश्वासू नेते अविनाश जाधव यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अविनाश जाधव हे ठाणे पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी सोशल मीडियातून या पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहेत. तसे पत्र त्यांनी राज ठाकरेंना दिले आहे. माफी असावी साहेब, असे जाधव यांनी सोशल मीडियात म्हटले आहे. ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray, Avinash Jadhav
Mohan Bhagwat : जोडप्याला किमान तीन मुलं हवीत! मोहन भागवतांना लोकसंख्येबाबत सतावतेय चिंता...

दरम्यान, अविनाश जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला असला तरी अद्याप राज ठाकरेंनी तो राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळे ते काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. जाधव हे ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय केळकर आणि अविनाथ जाधव यांच्यात थेट लढत झाली होती. जाधव यांचा त्यावेळी 19 हजार मतांनी पराभव झाला होता.

यंदाच्या निवडणुकीत मात्र जाधव यांना मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी तिरंगी लढत जाली. केळकर यांनी 1 लाख 20 हजारांहून अधिक मते मिळवत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजन विचारे आणि जाधवांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. जाधव यांना केवळ 42 हजार मते मिळाली. तर विचारेही 62 हजारांपर्यंतच मजल मारू शकले.

Raj Thackeray, Avinash Jadhav
Eknath Shinde : दरे गावातून एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, 'माझा निर्णय मी घेतलाय...'

निवडणूक निकालानंतर जाधव यांनी ईव्हीएमवरून निशाणा साधला होता. मनसैनिकांनी कोव्हिडमध्ये काम केले. गेली पाच वर्ष ते काम करत होते. मात्र जे आमदार लोकांना 10-10 वर्ष भेटले नाहीत ते लाखांच्या फरकाने निवडून आले. हे कसं शक्य आहे. ईव्हीएमशिवाय हे शक्य नव्हते.

विरोधी पक्ष एकत्र येऊनही काही होऊ शकत नाही. यंत्रणेने सीट आधीच सेट केल्या होत्या. भाजप विरोधात लाट दिसत होती. मात्र, त्यांनी चित्र तयार केले, लाडकी बहीण, कटेंगे तो बटेंगेचे. कारण त्यांना मोठ्या यशाला कारण पाहिजे होते, असे देखील अविनाश जाधव म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com