Mohan Bhagwat : जोडप्याला किमान तीन मुलं हवीत! मोहन भागवतांना लोकसंख्येबाबत सतावतेय चिंता...

India Population Fertility Rate Census : मोहन भागवत यांनी लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत देशातील लोकसंख्या वाढीचा दर कमी झाल्याचे म्हटले आहे.
Mohan Bhagwat
Mohan BhagwatSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : लोकसंख्यावाढीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोठं विधान केले आहे. हिंदू जोडप्याला किमान तीन मुले हवीत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी भागवतांनी लोकसंख्याशास्त्राचा हवाला दिला आहे. लोकसंख्या वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा कमी व्हायला नको, तसे झाल्यास समाज नष्ट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

नागपूर येथे आयोजित कठाले कुल संमेलनात बोलताना भागवत यांनी ही भूमिका मांडली. अनेक भाषा आणि समाज अशाचप्रकारे नष्ट झाल्याचे सांगत भागवत म्हणाले, साल 2000 च्या जवळपास भारतातील लोकसंख्येचे धोरण तयार करण्यात आले होते. देशातील लोकसंख्या वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा जास्त असायला हवा, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते.

Mohan Bhagwat
Shivsena Politics: ठाकरेंच्या शिलेदारांमागे पोलिसांचा ससेमिरा...आता माजी नगरसेवकावर दरोडयाचा गुन्हा!

अनेक जोडपी एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाहीत, यावरही भागवतांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, लोकसंख्या शास्त्रानुसार लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला तर तो समाज नष्ट होतो. तो जगाच्या पाठीवर राहत नाही. तो स्वत:हून नष्ट होतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर वाढण्यासाठी जोडप्याला दोनपेक्षा जास्त म्हणजे किमान तीन अपत्य हवीत, असे भागवत यांनी सांगितले.

लोकसंख्या वाढीचा दर योग्य असणे देशाच्या भविष्यासाठी गरजेचे आहे, असे विधानही भागवतांनी केले आहे. दरम्यान, देशात मागील तीन वर्षांपूर्वी जनगणना अपेक्षित असताना झालेली नाही. त्यामुळे कोणत्या समाजाची लोकसंख्या किती आहे, याचे मापदंड 2011 च्या जनणनेच्या आधारे ठरवले जात आहेत. त्यातच भागवत यांनी लोकसंख्या वाढीच्या दरावरून पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले आहे.

Mohan Bhagwat
Raosaheb Danve News : मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलयं, फक्त शिक्कामोर्तब बाकी!

दुसरीकडे विरोधी पक्षांकडून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी आग्रही आहे. बिहारमध्ये मागील वर्षी अशी जनगणना झाली असून त्यानुसार आरक्षणामध्ये बदलही करण्यात आला आहे. सध्या काँग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना सुरू आहे. संपूर्ण देशात अशी जनगणना करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. यामाध्यमातून संबंधित समाजाचा लोकसंख्या वाढीचा दराबाबतही माहिती मिळू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com