आजचा विजय अंतिम नाही...अजून 'ही' शर्यत जिंकायचीय : अमोल कोल्हे

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना गुरूवारी परवानगी दिली आहे.
Bullock cart race
Bullock cart race

Sarkarnama

नवी दिल्ली : राज्यात बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. या निकालानंतरराष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी आनंद व्यक्त करत सर्वांचे अभिनंदन केले आहे. पण त्याचवेळी त्यांनी आजचा विजय अंतिम नसल्याचेही सांगितले आहे. अजून एक शर्यत जिंकायची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आनंदाची बातमी शेअर करत असल्याचे सांगत कोल्हे यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) बैलगाडा शर्यत सुरु व्हावी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु होती. त्यावर आज न्यायालयाने निकाल दिला. बैलगाडा मालक , शौकीन , बैलगाडा प्रेमी यांच्यासह मराठी माती आणि संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असं कोल्हे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Bullock cart race
भिर्रर्र...पुन्हा आवाज घुमणार! बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

या निकालाबद्दल मी तमाम बैलगाडा मालकांचे, शौकिनांचे, प्रेमींचे मनापासून अभिनंदन करतो. यासोबतच महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार व राज्य सरकार यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बैलगाडा शैर्यतीसंबंधी त्यांची भेट घेतल्यापासून पशुसंवर्धन मंत्री व महाराष्ट्र सरकारने मोठ्या तडफेने न्यायालयात बाजू मांडली आणि त्यामुळेच आज हा निर्णय आपल्या बाजूने लागला आहे, असे कोल्हे यानी नमूद केलं आहे.

यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवणारे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे वकील या सर्वांचेही कोल्हे यांनी आभार मानले आहेत. यासोबतच सर्वसामान्य जनतेने देखील याबद्दल संयम दाखवित शांततेच्या मार्गाने संघर्ष केला. वेळोवेळी या लढ्याला ताकद देण्याचं काम केलं याबद्दल त्यांचेही आभार. पण आजचा विजय हा अंतिम नाही याचीही जाणीव मी सर्वांना करून देऊ इच्छितो. द्विसदस्यीय खंडपीठाने दिलेला आजचा निर्णय ५ सदस्यीय खंडपीठासमोर अंतिम सुनावणी होईपर्यंत लागू असेल, असेही कोल्हे यांनी सांगितले.

तामिळनाडू, कर्नाटक या इतर राज्यांसमवेत महाराष्ट्राच्या याचिकेची एकत्रित सुनावणी ही ५ सदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या न्यायालयीन तसेच संसदीय प्रक्रियेची तयारी आपण अव्याहतपणे सुरु ठेवणार आहोत जेणेकरून आजचा मिळालेला तात्पुरता दिलासा आपल्याला कायमस्वरूपी मिळेल. यासाठी दिलेल्या शब्दाप्रमाणे मी कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्र सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे. म्हणूनच ही शर्यत देखील आपणच जिंकू, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com