NCBकडून माहिती देण्यास टाळाटाळ ; मोदी, शहांकडे तक्रार

मागील 3 वर्षांत जप्त केलेला अंमली पदार्थांचा माल, अंमली पदार्थांचा प्रकार, त्यांचा एकूण किंमत, एकूण गुन्हे आणि आरोपींची संख्या याची माहिती द्यावी, असे एका अर्जात विचारणा केली होती.
NCB
NCBsarkarnama

मुंबई : तीन वर्षात अंमली पदार्थावर केलेल्या कारवाईची माहिती देण्यास अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB)ने नकार दिला आहे. ''ही माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. एनसीबी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे,'' असं पत्र अर्जदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले आहे.

मागील 3 वर्षांत जप्त केलेला अंमली पदार्थांचा माल, अंमली पदार्थांचा प्रकार, त्यांचा एकूण किंमत, एकूण गुन्हे आणि आरोपींची संख्या याची माहिती द्यावी, असे एका अर्जात विचारणा केली होती, तर दुसऱ्या अर्जात गलगली यांनी विल्हेवाट लावलेल्या अंमली पदार्थांची विस्तृत माहिती विचारली होती.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी याबाबतच अर्ज एनसीबीकडे सादर देला होता. पण एनसीबीन त्यांनी ही माहिती देण्यास नकार दिला आहे. याबाबत गलगली म्हणाले, ''एनसीबी अधिकारी स्वतःहून प्रसार माध्यमातून अंमली पदार्थांची इत्यंभूत माहिती देतात आणि विविध दावा करतात. मग माहिती अधिकार कायद्यात नागरिकांना माहिती देताना टाळाटाळ का करतात? असा प्रश्न करत जर मुंबई पोलिस अशा प्रकाराची माहिती सहजरित्या उपलब्ध करते, तर मग एनसीबीतर्फे टाळाटाळ का केली गेली,''

NCB
ठाकरे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा ; शेलारांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना गलगली यांनी पत्र पाठवून मागणी केली आहे की, याबाबत स्पष्टता आणत अशा कारवाईची माहिती संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक नागरिकांना जप्त केलेला माल आणि त्याच्या विल्हेवाटाची माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे.

मृतदेह घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात ; स्मशानभूमीजवळच १८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (west bengal) रविवारची पहाट उगवली ती वाईट बातमी घेऊनच. रविवार हा अपघाताचा दिवस ठरला, रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या वाहनावर दुसरे वाहन धडकल्यानं यात अठरा जणांना आपले प्राण गमवावे लागले. पश्चिम बंगालमधील (west bengal) उत्तर 24 परगणा येथील बगदा भागातील हे रहिवाशी आहेत. मृतदेह नेणाऱ्या गाडीचा ट्रकसोबत झालेल्या (road accident) अपघातात १८ जणांना मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी आहेत. पश्चिम बंगालच्या नादीया जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. मृतदेह घेऊन जाणारे वाहन स्मशानभूमीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. दाट धुक्यामुळे चालकाला ट्रक दिसला नसावा आणि तो वेगात जाऊन ट्रकला धडकला असावा, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com