Nitesh Rane : ...तर शीरखुर्मा आणि बिर्याणीतला फरक कळणार नाही; आमदार नितेश राणे यांचा काँग्रेसला इशारा

Nitesh Rane on Congress : हिंदू समाज अशांत झाला, तर राहुल गांधी यांना खूष करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना शीरखुर्मा आणि बिर्याणी यातील फरक कळणार नाही असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane : राहुल गांधी यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा किंवा संकल्पना ही भाजपच्या पचनी पडत नसल्याचे दिसते. राहुल गांधी यांनी काल लोकसभेत भाषणात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपविरुद्ध जी काही टोलेबाजी केली, त्यावर भाजप आमदार नितेश राणे चांगलेच भडकले आहेत. हिंदू समाज अशांत झाला, तर राहुल गांधी यांना खूष करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना शीरखुर्मा आणि बिर्याणी यातील फरक कळणार नाही असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी काल लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला चांगले सुनावले. हिंदूंना अहिंसा पाहिजे. पण भाजपकडे नफरत आणि जातिवाद यापलीकडे काहीच अजेंडा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे सर्व हिंदू असे नाही. भाजप म्हणजे सर्व हिंदू असे नाही. आरएसएस म्हणजे सर्व हिंदू असे नाही, अशी टोलेबाजी राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांची ही टोलेबाजी भाजपला चांगलीच झोंबली आहे. राहुल गांधी यांचे भाषणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ कामकाजात उमटले.

Nitesh Rane
Gopichand Padalkar Vs Ambadas Danve : पडळकरांचं दानवेंना चॅलेंज; ‘कोणता शिवसैनिक बोट तोडायला येतो, तेच पाहतो...’

सत्ताधारी भाजपने सकाळीच राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक होत विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून घेतले. हिंदूंचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. समस्त हिंदूंची माफी मागा अशी मागणी केली. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील आपली आक्रमक प्रतिक्रिया दिली.

Nitesh Rane
Kishor Darade: विजयानंतर किशोर दराडे मुख्यमंत्र्यांना म्हणाले, 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला!

आमदार नितेश राणे (Nitest Rane) म्हणाले, "काल देशाच्या संसदेमध्ये राहुल गांधींनी हिंदू समाजावर जे काही भाष्य केले त्यातून हिंदूंचा अपमान झाला आहे. ते कदाचित विसरले असतील की 90 टक्के लोक हिंदू राहतात. हे हिंदू राष्ट्र आहे. हिंदू शांत आहे. राहुल गांधी ज्यांना खूष करण्याचे प्रयत्न करतात ते शांत राहतात. कारण हिंदू समाज शांत आहे". जर हिंदू समाज अशांत झाला, तर ज्यांना राहुल गांधी खूष करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना शीरखुर्मा आणि बिर्याणी यातील फरक कळणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

हिंदू समाजाला तिसरा डोळा उघडायला लावू नका.

राहुल गांधी यांनी लग्न का केले नाही, हा प्रश्न मला पडलेला आहे, असे देखील आमदार नितेश राणे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com