राजेश टोपेंनी घेतली पवारांची भेट ; जिल्हाबंदी, लोकल बंद होणार का ?

राजेश टोपे यांनी मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Rajesh Tope

Rajesh Tope

sarkarnama

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णही शंभरीपार जात आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का, जिल्हाबंदी होणार का, लोकल बंद होणार का? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. याला आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी उत्तर दिले आहे. टोपे हे माध्यमांशी बोलत होते.

मुंबईची लाईफलाइन असणारी लोकल (mumbai local) पुन्हा बंद होणार का? यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. यावर राजेश टोपे म्हणाले, ''तूर्तास जिल्हाबंदीचा निर्णय घेतलेला नाही, लोकल बंद करण्याचा राज्य सरकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी याबाबत नेहमी चर्चा होते. राज्यात पाँझिव्हिटीचा रेट वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी,''

राजेश टोपे यांनी मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. राजेश टोपे म्हणाले, ''मुंबईत आज फ्रन्ट लाइन वर्कर्स पाँझिटिव्ह येत आहेत. हि चिंतेची बाब असून कोरोनाशी लढताना मनुष्यबळ महत्वाचं आहे. डॉक्टर, पोलीस यांनी काम करताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे,'' मुंबईत सर्वाधिक लसीकरण झाले असून सध्या मुंबईतील रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेड उपलब्ध आहेत, असे टोपेंनी नमूद केले.

''गुरुवारी २४ तासात मुंबईत २० हजारांहून अधिक रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. एका दिवसात २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण मुंबई आढळले तर लॉकडाऊन करण्याचा इशारा महापालिका आयुक्त आणि महापौरांनी दिला होता. पण राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Rajesh Tope </p></div>
तब्येत सुधारतेयं म्हणून ८४ वर्षीय पठ्यानं घेतले कोरोना लशीचे ११ डोस

राजेश टोपे म्हणाले, ''मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये रोज चर्चा होते. रोज सकाळी ७ वाजता त्यांची फोनवर सविस्तर चर्चा होते. यामुळे त्यांना निर्णय घेण्यासही मदत होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी अधिकची माहिती घेतली. योग्य ते निर्णय मुख्यमंत्री आणि शरद पवार चर्चेतून घेतील आणि त्याची अमलबजावणी आम्ही करु,''

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना उपाययोजना करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे - पाटीलही उपस्थित होते. आज संध्याकाळपर्यंत आरोग्यविभाग त्यांच्या सूचना शरद पवार (Sharad Pawar) यांना पाठविणार आहे.

टोपे म्हणाले, ''लसीकरण वाढवले पाहिजे यावर एकमत झाले. ७० ते ८० लाख लोकांनी अजूनही पहिली लस घेतलेली नाही. १० तारखेनंतर प्रिकॉशन लसीकरण झाले पाहिजे त्याचे नियोजन कसे असणार याची माहिती पवारांनी घेतली. औषध, निर्बंध यावर चर्चा झाली. कौटुंबिक कार्यक्रमांवर कडक नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी. कोरोनाची वाढती आकडेवारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पवारांनी आधी समजून घेतलं, आरोग्य विभागाकडून काही सूचना मागवून घेतल्या आहेत. काय करावं काय, करू नये हे जाणून घेतलं. आज संध्याकाळपर्यंत ती माहिती शरद पवार यांना देऊ,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com