Ramgiri Maharaj : जोड्याने मारायची वेळ आली; आव्हाडांच्या 'त्या' टीकेला रामगिरी महाराजांचं प्रत्युत्तर, म्हणाले, "आव्हाड मूर्ख..."

Ramgiri Maharaj On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांसारखा मूर्ख माणूस मी आतापर्यंत पाहिलेला नाही, अशा शब्दात महंत रामगिरी महाराज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
Jitendra  Awhad, Ramgiri Maharaj
Jitendra Awhad, Ramgiri MaharajSarkarnama
Published on
Updated on

Ramgiri Maharaj Statement : जितेंद्र आव्हाडांसारखा मूर्ख माणूस मी आतापर्यंत पाहिलेला नाही, अशा शब्दात महंत रामगिरी महाराज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराज यांनी 'देशाचं राष्ट्रगीत 'जन-गण-मन' नाही, तर 'वंदे मातरम्' पाहिजे', असे त्यांनी म्हटलं होतं.

रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी राष्ट्रगीता संदर्भात केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेगत जितेंद्र आव्हाडांनी रामगिरी महाराजांवर सडकून टीका केली होती. "आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आहे. बॅनची मागणी कर ना बाबा! आता अति व्हायला लागलं, रामगिरीचं! इतिहास रामगिरीकडूनच शिकायचा देशानं?" असा एकेरी उल्लेख करत आव्हाड यांनी टीका केली होती.

दरम्यान, आता आव्हांडांच्या (Jitendra Awhad) या टीकेला रामगिरी महाराजांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, जितेंद्र आव्हाडासारखा मूर्ख माणूस मी आतापर्यंत पाहिलेला नाही. इतिहास आहेच तो फक्त वाचण्याची गरज आहे. इतिहास काय आज लिहिलेला नाही. तो शिकण्याची आवश्यकता नाही. जो आहे तो इतिहास त्यांनी वाचण्याची गरज आहे पण त्यांना तो वाचायचा नाही हेच दुर्दैव आहे."

Jitendra  Awhad, Ramgiri Maharaj
Tirupati Stampede : "रांगेतील एका महिलेला अस्वस्थ वाटू लागलं अन्..."; चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली? देवस्थान समितीने सांगितलं नेमकं कारण

रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) अयोध्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी रामगिरी महाराज आहे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "प्रत्येक चित्रपटाच्या सुरूवातीपूर्वी राष्ट्रगीत वाजवलं जातं. हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 साली कोलकाता येथे जॉर्ज पंचम यांच्यासमोर गायल होतं. ते राष्ट्राला संबोधून गायलं नव्हतं तर ते जॉर्ज पंचमची यांची स्तुती करण्यासाठी गायलं होतं. त्यामुळे हे गीत राष्ट्राला समर्पित नाही. त्यामुळे वंदे मातरम हेच खऱ्या अर्थानं आपंलं राष्ट्रगीत आहे.

Jitendra  Awhad, Ramgiri Maharaj
Sharad Pawar : "संघ दक्ष आणि आपण.." विधानसभा निवडणुकीत पराभव नेमका कशामुळे? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

रवींद्रनाथ टागोर यांचं शिक्षणक्षेत्रात मोठं कार्य आहे. पण सध्या ज्याप्रमाणे शिक्षण संस्था चावणाऱ्या लोकांना राजकीय लोकांशी समतोल राखावा लागतो. ब्रिटीश काळातही शिक्षण संस्था चालवणाऱ्यांना ब्रिटीशांना धरून चालावं लागत होतं, म्हणून टागोर ब्रिटीशांची स्तुती केली आणि त्यामुळेच त्यांना नोबल पुरस्कार मिळाला."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com